IPL 2024 Rajasthan Royals vs Lucknow Super Giants  Sakal
IPL

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 Playoffs: दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्याने राजस्थान रॉयल्स आयपीएल 2024 प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला आहे. त्यामुळे आता प्लेऑफसाठी फक्त दोन जागा शिल्लक आहेत.

Pranali Kodre

IPL 2024 Playoffs: आयपीएल 2024 स्पर्धेत मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात सामना झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने 19 धावांनी विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयाने राजस्थान रॉयल्ससाठी प्लेऑफचे दरवाजे उघडून दिले आहेत.

राजस्थान प्लेऑफमध्ये स्थान पक्के करणारा कोलकाता नाईट रायडर्सनंतरचा दुसरा संघ ठरला आहे. त्यामुळे आता प्लेऑफसाठी केवळ दोन जागा शिल्लक राहिल्या आहेत.

राजस्थानने आयपीएल 2024 मध्ये आत्तापर्यंत 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकून 16 पाँइंट्स मिळवले आहेत. त्यांना 4 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. राजस्थानचे आणखी दोन सामने बाकी आहेत.

परंतु, आता 16 पाँइंट्सपर्यंत पोहण्याची संधी फक्त चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोनच संघांना आहे. त्याचमुळे राजस्थानचे प्लेऑफमधील स्थान पक्के झाले आहे.

दरम्यान, आता उरलेल्या 2 जागांसाठी सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या पाच संघात चूरस आहे. त्यातही हैदराबाद आणि चेन्नई यांच्यासाठी प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे त्यांच्यात हातात आहे, तर इतर तिन्ही संघांना बाकी सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.

सध्या सनरायझर्स हैदराबादलने 12 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे 14 पाँइंट्स आहेत. तसेच दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांपैकी त्यांनी एकजरी सामना जिंकला, तरी ते प्लेऑफचं तिकीट पक्कं करतील.

पण जर त्यांना दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं, तर इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. चेन्नई सुपर किंग्सने 13 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत, तर 6 सामने पराभूत झाले आहेत. त्यांचे सध्या 14 पाँइंट्स आहेत.

अशात जर चेन्नईने बेंगळुरूविरुद्ध होणारा अखेरचा साखळी सामना जिंकला, तर ते प्लेऑफसाठी थेट पात्र ठरतील. मात्र, जर पराभूत झाले, तर इतर संघांच्या निकालावर अवलंबू रहावे लागले.

तसेच जर चेन्नईकडून बेंगळुरू संघ अखेरच्या साखळी सामन्यात पराभूत झाला, तर त्यांचे आव्हान संपेल. बेंगळुरूला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी 18 मे रोजी होणाऱ्या सामन्यात चेन्नईविरुद्ध एकतर 18 पेक्षा जास्त धावांनी किंवा 18 षटकांच्या आत सामना जिंकावा लागणार आहे. तरच नेट रन रेटच्या आधारावर ते प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवू शकतात.

दरम्यान, लखनौ आणि दिल्लीचे आव्हान कायम जरी असले, तरी त्यांच्यासाठी हा मार्ग कठीण असणार आहे.

कारण दिल्लीचे सर्व 14 साखळी सामने खेळून झाले आहेत. त्यांनी 7 विजय आणि 7 पराभव स्विकारले आहेत. त्यामुळे त्यांचे 14 पाँइंट्स आहेत. मात्र त्यांचा नेट रन रेट चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळुरूपेक्षा कमी आहे. त्यामुळे प्लेऑफसाठी त्यांना एखाद्या चमत्काराची अपेक्षा करावी लागेल.

लखनौने 13 सामन्यांपैकी 6 सामने जिंकलेत, तर 7 पराभूत झालेत. त्यामुळे त्यांचे 12 पाँइंट्स आहेत. त्यांचा एक सामना बाकी आहे. जर त्यांनी उर्वरित एक साखळी सामना जिंकला, तरी ते 14 पाँइंट्सपर्यंतच पोहचू शकणार आहेत.

अशात त्यांना खूपच मोठा विजय मिळवावा लागेल, त्याचबरोबर बेंगळुरू चेन्नईला पराभूत करेल आणि हैदराबाद दोन्ही सामने पराभूत होईल ही अपेक्षा करावी लागेल. इतकेच नाही, तर बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि दिल्ली या चार संघांपैकी किमान तीन संघांचे नेट रन रेट त्यांच्यापेक्षा कमी राहिल याची अपेक्षा करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

Minister Nitin Gadkari: पाणी व्यवस्थापनाने शेतकरी ऊर्जादाता: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; नाम फाउंडेशन दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

Sharad Pawar: जरांगेंशी आमचा कसलाही संबंध नाही: शरद पवार यांची स्पष्टोक्ती; आरक्षणप्रश्‍नी एकत्रित विचार करण्याचे आवाहन

पोलिस भरती ठरली, पण नव्या पोलिस ठाण्यांचा निर्णय होईना! सोलापुरातील १७ ठाण्यांसह राज्यभरातील शेकडो प्रस्ताव 'गृह'कडे धुळखात; गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने अंमलदारांवर तपासाचे ओझे

SCROLL FOR NEXT