India vs Australia WTC Final
India vs Australia WTC Final 
IPL

WTC Final 2023: मिशन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप! टीम इंडियाची पहिली तुकडी इंग्लंडला रवाना

Kiran Mahanavar

India vs Australia WTC Final 2023 : आयपीएलमध्ये आव्हान संपुष्टात आलेल्या संघांतील विराट कोहली, मोहम्मद सिराजसह सात जण मंगळवारी पहाटे लंडनला रवाना होत आहेत. या खेळाडूंसाठी आता कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचे मिशन आहे.

विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश असलेल्या बंगळूर संघाचे आयपीएलमधील आव्हान रविवारी संपुष्टात आले. त्या अगोदर राजस्थान, दिल्ली आणि कोलकता यांनाही प्ले-ऑफ न गाठता आल्यामुळे आर. अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर यांच्यासह आयपीएलमधून अगोदर दुखापतीमुळे बाहेर गेलेले उमेश यादव व जयदेव उनाडकट हे सुद्धा आज एकाच विमानातून लंडनला जाणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह सपोर्ट स्टाफही असणार आहे. उमेश आणि उनाडकट तंदुरुस्त झाल्याची माहिती मिळत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान ओव्हल मैदानावर होत आहे. पहिल्या टप्प्यात आज सात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ रवाना झाल्यानंतर आणि दोन टप्प्यात उर्वरित खेळाडू लंडनला जातील, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, इशान किशन, शुभमन गिल, मोहम्मद शमी, के. एस. भारत आणि अजिंक्य रहाणे या सात खेळाडूंचे संघ प्लेऑफमध्ये असल्याने ते सध्या भारतात असतील. चेतेश्वर पुजारा इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळत असल्यामुळे तो अगोदरच लंडनमध्ये आहे.

भारताला सराव सामना नाही

  • इंग्लिश कौंटी स्पर्धेचा मोसम सुरू असल्यामुळे भारताला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी सराव सामना मिळणार नाही, तसेच ही आयसीसीची स्पर्धा असल्यामुळे इंग्लंड क्रिकेट मंडळालाही सराव सामन्यासाठी पुढाकार घेणे बंधनकारक नाही.

  • अशा परिस्थितीतही कौंटी संघांनी जरी खेळण्याची तयारी दर्शवली तरी तो संघ दुय्यम श्रेणीचा असेल. कोणताही कौंटी संघ अव्वल खेळाडूंना या सामन्यात खेळण्याची परवानगी देणार नाही, त्यामुळे कमकवुत संघाबरोबर खेळून आवश्यक असलेला सराव आपल्या संघाला मिळणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

  • चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता भारतीय संघातील सर्व खेळाडू आयपीएलमध्ये खेळून कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार आहेत, तर ऑस्ट्रेलिया संघातील केवळ तीनच खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अधिक तयारीचे असतील, असे भाष्य रिकी पाँटिंग यांनी गेल्याच आढवड्यात केले होते.

  • पाँटिंग यांनी अर्थातच त्यांच्या ऑस्ट्रेलियाच्या बाजूने भाष्य केले असले तरी दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजी करत फॉर्म मिळवला आहे. त्याचा फायदा कसोटी अंतिम सामन्यात निश्चितच होऊ शकेल, त्याच वेळी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मात्र क्रिकेटपासून दूर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT