Kapil Dev
Kapil Dev  sakal
क्रीडा

Kapil Dev : टीम इंडियासुद्धा नवे चोकर्स ? वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कप्तानची घणाघाती टीका

सकाळ ऑनलाईन टीम

Kapil Dev Says Team India Chokers : टीम इंडियाला टी-20 विश्वचषक-2022 जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर संघाला बाहेर पडावे लागेल, असे कोणालाही वाटले नव्हते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावून उपांत्य फेरीत धडक मारली होती, पण 15 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये पुन्हा चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता भारताचे माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांनी या संघाला 'चोकर्स' म्हटले आहे.

हेही वाचा : हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी आता टीम इंडियाला 'चोकर्स' म्हटले आहे. गेल्या सहा विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरीत पराभूत होऊन पाचव्यांदा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कपिल यांनी सांगितले की, मी फार कडक शब्दात टीका करणार नाही कारण हे तेच खेळाडू आहेत. ज्यांनी आम्हाला भूतकाळात सेलिब्रेट करण्याची संधी दिली आहे. पण होय, आम्ही त्यांना 'चोकर' म्हणू शकतो. एवढ्या जवळ आल्यानंतर पुन्हा पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागत आहे, हे नाकारून चालणार नाही.

भारताने शेवटची आयसीसी स्पर्धा 2013 मध्ये जिंकली होती, तेव्हा त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. त्यानंतर टीम इंडिया 2014 टी-20 विश्वचषक (फायनल), 2015 एकदिवसीय विश्वचषक (सेमी-फायनल), 2016 टी-20 विश्वचषक (सेमी-फायनल), 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी (फायनल), 2019 एकदिवसीय विश्वचषक (सेमी-फायनल) यासह 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 2022 टी-20 वर्ल्ड कप (उपांत्य फेरी) फायनलमध्ये देखील संघाचा पराभव झाला आहे.

अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने 6 गडी गमावत 168 धावा केल्या. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि माजी कर्णधार विराट कोहलीने अर्धशतके झळकावली. हार्दिकने 33 चेंडूत 63 तर विराटने 40 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले. यानंतर इंग्लंडने 16 षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. कर्णधार जोस बटलर 80 आणि अॅलेक्स हेल्सने 86 धावा करून नाबाद माघारी परतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT