MS Dhoni 2011 World Cup Virender Sehwag  
क्रीडा

World Cup Team India: 'खिचडी खाऊन धोनीने जिंकला वर्ल्डकप' सेहवागने सांगितली 2011 मधील यशाची अंधश्रद्धा

सकाळ वृत्तसेवा

MS Dhoni Virender Sehwag : वानखेडे स्टेडियमवर २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीने मारलेला तो षटकार आणि त्यानंतर देशभर झालेला जल्लोष अनेकांनी याची देही याची डोळा अनुभवलेला आहे. या अभूतपूर्व यशाच्या अनेक कहाण्या सांगण्यात आल्या आहेत, परंतु वीरेंद्र सेहवागने कधी जाहीर न झालेले गुपित आज जाहीर केले. संपूर्ण स्पर्धेत आम्ही सर्व जण कोणती ना कोणती अंधश्रद्धा बाळगून होतो. कर्णधार धोनीसाठी तर खिचडी आणि संघाचा विजय हीच अंधश्रद्धा होती, अशी माहिती सेहवागने उघड केली.

सेहवाग म्हणाला, २०११ मधील ही विश्वकरंडक स्पर्धा आम्हा खेळाडूंसाठीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयासाठी प्रतिष्ठेची झाली होती. जो जो आम्हाला भेटत होता तो प्रत्येक जण वर्ल्डकप कसाही जिंका असेच सांगत होता, पण तोपर्यंत यजमान देश कधीही वर्ल्डकप जिंकलेला नाही मग हे त्या वेळी कसे शक्य होईल अशी धाकधुक आम्हाला होती.

आम्ही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अंधश्रद्धा बागळत होतो. धोनीसाठी खिचडी हीच अंधश्रद्धा होती. अंतिम सामन्यापर्यंत त्याच्याकडून धावा झाल्या नाहीत, परंतु संघाचा विजय मात्र होत होता. खिचडी आणि विजय असं समीकरण तयार झाल्यामुळे धोनीने संपूर्ण स्पर्धेत खिचडीच खाल्ली, असे सेहवागने सांगितले.

विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सेहवाग आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन उपस्थित होते. त्या वेळी सेहवागने आपल्या स्वभावाप्रमाणे शाब्दिक फटकेबाजी केली.

१९९२ मध्ये आपण क्रिकेट पाहायला सुरुवात केली. सचिन तेंडुलकरला पाहण्यासाठी मी विश्वकरंडक स्पर्धा पाहायला लागलो. त्या वेळी माझ्या घरी केबलही नव्हती, त्यामुळे शेजाऱ्यांकडे जाऊन मी ती स्पर्धा पाहिली होती. सर्व देशांविरुद्ध सामने खेळायला मिळणाऱ्या अशा विश्वकरंडक स्पर्धेत खेळायची संधी आपल्यालाही मिळायला हवी. त्यामुळे माझ्यासाठी वर्ल्डकप ही ऑलिंपिकसारखी आहे, असे सेहवाग म्हणतो.

सेहवाग म्हणतो...

भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड उपांत्य फेरी गाठतील द्विराष्ट्रीय मालिकांत कितीही धावा करा, परंतु वर्ल्डकपमधील धावा आणि विकेट अनंतकाळ लक्षात राहतात धोनीचा ‘तो’ षटकार, कपिलदेव यांच्या १७५ धावा कोणीच विसरू शकत नाही. ऑलिंपिकपर्यंत खेळाडू माहिती नसतात, पण पदक जिंकल्यावर तो खेळाडू हिरो होतो. २०११ चा वर्ल्डकप जिंकला तेव्हा सर्व देशवासीय रस्त्यावर होते. वानखेडे ते आमचे हॉटेल यातील अंतर पाच मिनिटांचे, पण त्या दिवशी आम्हाला दीड तास लागला एवढे लोक जल्लोष करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT