Pak vs Aus ODIs T20I  Sakal
क्रीडा

PAK vs AUS : रावळपिंडीतील सामने आता लाहोरच्या मैदानात रंगणार

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 मार्च पासून रंगणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे आणि टी 20 मालिकेत बदल करण्यात आला आहे. रावळपिंडीच्या मैदानात रंगणारे सामने आता कराचीच्या मैदानात स्थलांतरित करण्यात आले आहेत. इस्लामाबादमधील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. पाकिस्तान मंत्री शेख रशीद अहमद यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. (Pak vs Aus ODIs T20I shifted from Rawalpindi to Lahore amidst political tension)

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ODI आणि T20I मालिका लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहेत. द्विपक्षीय संघातील कसोटी मालिकेतील अखेरचा सामनाही याच मैदानात रंगणार आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडीच्या मैदानातच खेळवण्यात आला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. रावळपिंडिच्या खेळपट्टीवर चांगलीच टीका झाली होती. ही खेळपट्टी सरासरीपेक्षाही खराब असल्याचा शेरा आयसीसीने दिला होता.

पाकिस्तान सरकारमधील मंत्री अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, "राजधानीमधील राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर रावळंपिंडीतील सामने हे लाहोरमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

एएफपीच्या वृत्तानुसार, कोणत्याही संघातील खेळाडूला धमकी वैगेरे देण्यात आलेली नाही. इस्लामाबादमध्ये सरकारविरोधात अंदालन करण्यात येत आहे. या घटना लक्षात घेऊन सुरक्षिततेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सामन्याचे स्थळ बदलण्यात आले आहे. पाकिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, पंतप्रधान इमरान खान यांच्याविरोधात संसदेत लवकरच अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT