ranji trophy history 9 batsman bengal scored fifty
ranji trophy history 9 batsman bengal scored fifty 
क्रीडा

रणजीमध्ये पहिल्यांदा झालाय मोठा विक्रम, तब्बल 9 फलंदाजांनी...

Kiran Mahanavar

Ranji Trophy: रणजी ट्रॉफी 2021-22 चे उपांत्यपूर्व सामने बेंगळुरूमध्ये खेळले जात आहेत. बंगाल आणि झारखंड यांच्यामध्ये सामना खेळला जात आहे. बंगालच्या संघाने रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. बंगाल संघासाठी कोणताही फलंदाज मैदानात आला, त्याने संघासाठी कमीत-कमी 50 धावा केल्या आहे. एक-दोन नाही तर, 9 फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. संघाची धावसंख्या 770 च्या पुढे गेली आहे. (ranji trophy history 9 batsman bengal scored fifty)

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा कोणत्याही एका संघाच्या 9 फलंदाजांनी 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. झारखंडविरुद्ध बंगाल संघाने 218.4 षटकात फलंदाजी करताना एकूण 773 धावा केल्या. बंगालच्या केवळ 7 विकेट पडल्या होत्या आणि संघाने डाव घोषित केला. असा हा एक विक्रम बनला आहे. त्यामध्ये पहिल्या 9 फलंदाजांनी प्रथम श्रेणी सामन्यात किमान 50 धावा केल्या.

बंगालकडून अभिषेक रमनने 61, कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने 65, सुदीप घारामीने 186, अनुस्तुप मजुमदारने 117, मनोज तिवारीने 73, अभिषेक पोरेलने 68, शाहबाज अहमदने 78, सायन मोंडलने 53 आणि आकाशने दीपिकने 53 धावा केल्या. आकाशने 18 चेंडूत 8 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या आहे. संघ एवढी मोठी धावसंख्या बनवण्याचे कारण म्हणजे रणजी ट्रॉफीमध्ये सामना अनिर्णित राहिल्यास पहिल्या डावात जास्त धावा करणाऱ्या संघाला पुढे खेळण्याची संधी मिळते. बंगाल संघानेही तेच केले आणि 770 हून अधिक धावा केल्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT