Ravi-Shastri-New-Coach 
क्रीडा

शास्त्रींनंतर भारताचे नवे कोच कोण? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

शास्त्रींनंतर भारताचे नवे कोच कोण? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत BCCI चे काही अधिकारी या खेळाडूशी चर्चा करत असल्याचीही माहिती Ravi Shastri and His Coaching Staff Likely To Leave Team India After T20 World Cup 2020 Rahul Dravid can be new coach says Reports vjb 91

विराज भागवत

BCCI चे काही अधिकारी या खेळाडूशी चर्चा करत असल्याचीही माहिती

शभारतीय क्रिकेट संघ गेल्या काही वर्षात ICC ने आयोजित केलेल्या कोणत्याही स्पर्धांचे विजेतेपद मिळवू शकलेला नाही. २०१९मध्ये झालेल्या वन डे विश्वचषक स्पर्धेत भारताला सेमीफायनलमध्ये बाहेर पडावे लागले. २०२१मध्ये झालेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडिया फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाली. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष २०२१च्या टी२० विश्वचषक स्पर्धेकडे लागले आहे. ही स्पर्धा आता अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच संघ जोरदार तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत ही स्पर्धा झाल्यावर संघाचे कोच रवी शास्त्री प्रशिक्षकपद सोडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच, BCCIचे अधिकारी एका माजी क्रिकेटपटूशी नवा कोच होण्यासाठी चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरूण आणि फलंदाजी कोच विक्रम राठोड हे तिघेही आपापल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सकाळी काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, टी२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर हे तिघेही आपल्या पदाचा त्याग करणार असल्याचे बोलले जात आहे. रवी शास्त्री यांनी BCCI ला विनंती केली आहे की त्यांचा प्रशिक्षकपदाचा करार वाढवू नये असे सांगितल्याचेही बोलले जात आहे. त्याशिवाय, कोचिंग स्टाफमधील काही सदस्य विविध IPL संघांसोबत चर्चा करत आहेत. अशा परिस्थितीत BCCI चे काही सदस्य माजी फलंदाज राहुल द्रविड याच्याशी प्रशिक्षकपदाबद्दल चर्चा करत असल्याचेही सांगितले आहे.

Rahul Dravid

शास्त्री आणि टीम इंडिया

रवी शास्त्री भारतीय संघासोबत सर्वप्रथम २०१४ मध्ये संचालक म्हणून कार्यरत झाले. २०१६ टी-२० विश्वचषक संपेपर्यंत ते संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यानंतर वर्षभरासाठी अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पराभूत झाला. त्यानंतर शास्त्रींना पूर्णवेळ प्रशिक्षकपदी नेमण्यात आले. पण ICCच्या स्पर्धांमध्ये मात्र भारताला अद्याप विजेतेपद मिळालेले नाही.

शास्त्री आणि टीम इंडिया

रवी शास्त्री भारतीय संघासोबत सर्वप्रथम २०१४ मध्ये संचालक म्हणून कार्यरत झाले. २०१६ टी-२० विश्वचषक संपेपर्यंत ते संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यानंतर वर्षभरासाठी अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पराभूत झाला. त्यानंतर शास्त्रींना पूर्णवेळ प्रशिक्षकपदी नेमण्यात आले. पण ICCच्या स्पर्धांमध्ये मात्र भारताला अद्याप विजेतेपद मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT