Rohit Sharma and Virat Kohli alone will not win you the World Cup Kapil Dev cricket  
क्रीडा

Kapil Dev: रोहित अन् विराट वर्ल्ड कप जिंकू देणार नाही...; कपिल देव स्पष्टच बोलले

रोहित, विराट कामाचे नाहीत, ते काही...कपिल देव यांची तिखट प्रतिक्रिया

Kiran Mahanavar

आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. 2021 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ टॉप चार मध्ये पण नव्हता. तर गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडने भारतीय संघाचा उपांत्य फेरीत 10 गडी राखून पराभव केला. अशा परिस्थितीत माजी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी भारतीय संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

कपिल देव एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, 'विश्वचषक जिंकायचा असेल, तर प्रशिक्षक, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. वैयक्तिक स्वार्थ मागे ठेवून संघाचा विचार करावा लागतो. विराट कोहली किंवा रोहित शर्मा किंवा दोन-तीन खेळाडूंवर विश्‍वचषक जिंकण्यासाठी तुमचा विश्‍वास असेल, तर असे कधीही होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या टीमवर विश्वास ठेवायला हवा.

पुढे बोलताना कपिल देव म्हणतात की, 'काही खेळाडू असे असतात जे तुमच्या संघाचे आधारस्तंभ बनतात. संघ त्याच्याभोवती फिरतो, परंतु आता आपल्या ते संपवून किमान 5-6 खेळाडू तयार करावे लागतील. म्हणूनच मी म्हणतो, तुम्ही विराट कोहली आणि रोहित शर्मावर अवलंबून राहू शकत नाही. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणारे खेळाडू हवे आहेत. तरुणांनी पुढे येऊन 'ही आमची वेळ आहे' असे म्हणण्याची गरज आहे.

आगामी एकदिवसीय विश्वचषकाबाबत बोलताना कपिल देव यांनी आपले आपले मत मांडताना म्हणाले की, 'सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे विश्वचषक भारतात होणार आहे. परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली कोणालाच माहीत नाही. गेल्या 8-10 वर्षांपासून रोहित आणि विराट हे भारताचे दोन महत्त्वाचे क्रिकेटपटू आहेत. विराट आणि रोहितचा हा शेवटचा विश्वचषक असेल का, असा प्रश्न अनेकांनी विचारायला सुरुवात केली आहे. मला विश्वास आहे की ते खेळू शकतात पण त्यांना खूप मेहनत करावी लागेल. फिटनेस महत्त्वाची भूमिका बजावेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत्री आयात ड्युटी रिफंड योजना बंद; धरणांतील गाळ आणि वाळू काढून जलसाठा वाढवणार, महाराष्ट्र सरकारचे शेतकऱ्यांसाठी नवे निर्णय

काव्यासोबतच्या रोमँटिक सीन्सवर काय असते पार्थच्या खऱ्या पत्नीची रिअ‍ॅक्शन? रुपाली म्हणते- 'कसं सहन...'

Crime: विश्वास ठेवून मित्राच्या घरी गेली, तिथेच नको ते घडलं; भाईंदरमधील धक्कादायक घटना

मला माझी योग्यता सिद्ध करायची असेल तर…: निवृत्तीच्या चर्चांवर विराट कोहलीने मौन सोडले; २०२७ च्या वर्ल्ड कपबाबतही मोठं विधान

Farmers Protest: कोकणातील शेतकरी मुंबईत आक्रमक! बडे नेते आणि आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु; काय आहे मागणी?

SCROLL FOR NEXT