Rohit Sharma Rohit Sharma
क्रीडा

हिटमॅन म्हणाला, खेळाडूंना मैदानात स्वातंत्र्य मिळाला पाहिजे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोणत्याही खेळाडूसाठी स्वातंत्र्य फार महत्त्वाचे असते. खेळताना संघ किंवा कर्णधाराकडून स्वातंत्र्य मिळाले नाही तर कामगिरीवर परिणाम होते. यामुळे खेळाडूंना मैदानावर उतरताना पूर्ण स्वातंत्र्य देणे गरजेचे असते. याबाबत आपले रोखठोक मत टी-२० चा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे.

न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आलेला आहे. अद्याप खेळल्या गेलेल्या दोन टी-२० सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या रूपात भारताला नवीन कर्णधार मिळाला आहे. मालिकेत भारताने २-० अशी अभेद्य आघाडी घेतलेली आहे. विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आणि बेंच-स्ट्रेंथबद्दल मोकळेपणाने बोलला.

कर्णधार म्हणून माझे काम हे असेल की नवीन खेळाडू जेव्हाही खेळायला येतो तेव्हा त्यांना आरामदायक वाटले पाहिजे. इतर कोणत्याही गोष्टीची चिंता न करता तो खेळला पाहिजे. यासाठी खेळाडूंना स्वातंत्र्य द्यायला हवे. हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. खेळाडूंनी मैदानावर येताच फक्त खेळाचा विचार करा, असे रोहित शर्मा म्हणाला.

आमचा संघ खूप तरुण आहे. अनेक खेळाडूंनी खूप कमी सामने खेळले आहेत. अनेक खेळाडू संधीची वाट पाहत आहेत. परंतु, त्यांना नक्कीच भारतासाठी खेळता येईल. प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असेल. कठीण परिस्थितीत आम्ही चांगली कामगिरी केली, असेही रोहित शर्मा म्हणाला. अनेक मोठ्या खेळाडूंना विश्रांती दिली असतानाही रोहित शर्माच्या नेतृत्वात नव्या खेळाडूंना संधी मिळत आहे, हे विशेष...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT