T20 World Cup Semifinal Teams sakal
क्रीडा

T20 World Cup : सेमी फायनलचा रणसंग्राम! भारत कोणाबरोबर खेळणार?

टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर मोठा विजय, सेमीफायनलमध्ये या संघाविरुद्ध खेळणार...

Kiran Mahanavar

T20 World Cup Semifinal Teams : टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारत आणि पाकिस्तान गट-2 मधून पात्र ठरले आहेत, तर गट-1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. म्हणजेच आता टी-20 विश्वचषक 2022 च्या सेमी फायनलचा रणसंग्राम सुरू झाला आहे.

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत ग्रुप 2 च्या अव्वल स्थानावर झेप घेतली. ग्रुप-1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड तर ग्रुप 2 मधून भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ -20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीसाठी पात्र झाले. ग्रुप-1 मधील टॉप न्यूझीलंडचा सामना ग्रुप-2 मधील दुसऱ्या स्थानावरील पाकिस्तानशी होणार आहे. ग्रुप-2 मधील टॉप टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी खेळणार आहे.

उपांत्य फेरीत गेलेले संघ

  • ग्रुप 1 : न्यूझीलंड, इंग्लंड

  • ग्रुप 2: भारत, पाकिस्तान

सेमी फायनलचा रणसंग्राम

  • न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - 9 नोव्हेंबर, सिडनी (दुपारी 1.30)

  • भारत विरुद्ध इंग्लंड - 10 नोव्हेंबर, अॅडलेड (दुपारी 1.30)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT