team india defeat against west indies  
क्रीडा

WI vs IND : ७ वर्षांनंतर वेस्ट इंडिजमध्ये गमावली मालिका! टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण?

Kiran Mahanavar

Team India Defeat Against West Indies : कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकणाऱ्या टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-3 असा पराभव केला. वेस्ट इंडिजने मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताचा 8 विकेटने पराभव केला आणि 7 वर्षांनंतर टीम इंडिया विरुद्ध टी-20 मालिका जिंकली. टीम इंडियाच्या या पराभवाची 3 मुख्य कारणे होती.

मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना काल फ्लोरिडामध्ये खेळला गेला. हा निर्णायक सामना होता कारण आतापर्यंत मालिका 2-2 अशी बरोबरीत होती. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 165 धावा केल्या. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य 18 षटकांत केवळ 2 विकेट्स गमावून पूर्ण केले आणि मालिका आपल्या नावे केली.

सलामीवीर अपयशी

या संपूर्ण मालिकेत टीम इंडियाला फलंदाजी करताना खराब सुरुवातीचा सामना करावा लागला, त्यामुळेच या मालिकेत फलंदाजीमुळेच संघ अपयशी ठरला. चौथ्या टी-20 मध्ये यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्यातील 165 धावांची भागीदारी वगळता उर्वरित चार सामन्यांमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवात करण्यात अपयश आले.

शुभमन आणि इशान किशन यांनी पहिल्या दोन सामन्यांमध्ये सलामी दिली परंतु ते अपयशी ठरले, तर यशस्वी आणि शुभमन यांनी उर्वरित तीन सामने खेळले. गिलने 5 डावात 102 धावा केल्या, त्यापैकी 77 धावा एकाच डावात आल्या. दुसरीकडे, जैस्वालने 3 सामन्यात 84 धावांच्या इनिंगसह 90 धावा केल्या. इशानला 2 डावात केवळ 32 धावा करता आल्या.

हार्दिक-संजू फ्लॉप

कर्णधार हार्दिक पांड्या हा त्याच्या निर्णयांपेक्षा स्वतःच्या कामगिरीमुळे अधिक निराश होईल. या संपूर्ण मालिकेत तो ना बॅटने काही अप्रतिम करू शकला ना तो गोलंदाजीत सामना फिरवू शकला. हार्दिकने 4 डावात 110 च्या स्ट्राईक रेटने केवळ 77 धावा केल्या. त्याच वेळी, 5 डावांमध्ये, 15 षटकात केवळ 4 विकेट घेऊ शकला. गेल्या सामन्यात त्याने 18 चेंडूत केवळ 14 धावा केल्या, तर 3 षटकात 32 धावा दिल्या आणि रिकाम्या हाताने राहिला.

दुसरीकडे, संजू सॅमसनला या मालिकेत पूर्ण संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा उठवण्यात तो अपयशी ठरला. त्याला 3 डावात फलंदाजीची संधी मिळाली पण तो केवळ 32 धावा करू शकला, ज्यामध्ये 13 धावा ही सर्वात मोठी धावसंख्या होती.

चहल आणि अक्षर अपयशी

या मालिकेत भारतीय संघाची गोलंदाजी चांगली होती, पण लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल यांचे विशेष योगदान नव्हते. दोघेही खूप महागडे ठरले आणि विकेटही फारशा मिळाल्या नाहीत. गेल्या सामन्यात चहलने 4 षटकात 51 धावा दिल्या, तर एकही विकेट मिळाली नाही. इकॉनॉमी रेट 9.05 असताना चहलने 5 सामन्यात केवळ 5 विकेट घेतल्या. तर अक्षरला 4 डावात केवळ 11 षटके मिळाली ज्यात तो फक्त 2 विकेट घेऊ शकला. अक्षरचा बॅटचाही योग्य वापर झाला नाही आणि तो 3 डावात केवळ 40 धावा करू शकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

सायप्रसकडे फक्त पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका; भारतीय व्यवसायांसाठी मोठी संधी, विराज कुलकर्णींचा दावा

Hockey World Cup : पाकिस्तानचा मुर्खपणा, महत्त्वाचे सामान न घेताच खेळायला आले; रेफरीने बरोबर धारेवर धरले; माजी कर्णधार म्हणाला...

आईने इस्लाम स्वीकारला आणि आम्हालाही... शर्मिला टागोर यांची लेक सबा पतौडीचा खुलासा; म्हणाली - आम्ही कधीही मंदीरात...

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

SCROLL FOR NEXT