Team-India 
क्रीडा

"हे विसरू नका की याच टीम इंडियाने...", हुसेनचा इंग्लंडला इशारा

विराज भागवत

वाचा, काय म्हणाला इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन

Ind vs Eng Test: दुसऱ्या सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने (Team India) तिसऱ्या कसोटी सामन्यात अतिशय खराब कामगिरी केली. भारताचा पहिला डाव ७८ धावांत संपला. त्यानंतर इंग्लंडने (England) दमदार फलंदाजी (Batting) करत ४३२ धावा कुटल्या आणि भारतावर ३५४ धावांची आघाडी (Lead) घेतली. या आघाडीचा पाठलाग करताना भारताचा संघ २७८ धावांवर बाद झाला. त्यामुळे एक डाव व ७६ धावांनी सामना गमावण्याची नामुष्की भारतावर ओढवली. पण असं असलं तरीही इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने विराट अँड कंपनीबद्दल एक महत्त्वाचे विधान केले.

"हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी चेंडू स्विंग करून भारतीय फलंदाजांना हैराण केलं. भारताचे गोलंदाज प्रतिभावान असले तरी त्यांना त्या परिस्थितीचा तितका वापर करून घेता आला नाही. आता इंग्लंडने मालिकेत १-१ची बरोबरी घेतली असली तरी इंग्लंडने आराम करता कामा नये. आता इंग्लंडने कामाला लागायला हवं आणि पुढच्या दोन्ही सामन्यात तशीच कामगिरी करून मालिका जिंकायला हवी", असा सल्ला हुसेनने दिला.

"उर्वरित दोन सामन्यांसाठी ज्या खेळपट्ट्या आहेत त्या दोन्ही खेळपट्ट्या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या अशाच आहेत. त्यामुळे भारताला जास्त संधी देऊ नका. कारण इंग्लंडच्या संघाला हे विसरून चालणार नाही की ही तीच टीम इंडिया आहे जी ३६ धावांवर ऑलआऊट झाली होती आणि त्यानंतर पुढे ऐतिहासिक मालिका विजय मिळवला होता. त्यातही महत्त्वाचे म्हणजे भारताने तो विजय विराट कोहली नसताना मिळवला होता", असा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT