Team-India sakal
क्रीडा

T20 World Cup : 'टीम इंडियासाठी टी-20 वर्ल्ड कप आधी ही डोकेदुखी'

गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक हात सुके करण्यासाठी टॉवेलचा वापरही करीत नव्हते त्यामुळे...

Kiran Mahanavar

Team India T20 World Cup : भारताचे क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भुवनेश्वरकुमारच्या अखेरच्या षटकांतील गोलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी धावांची लयलूट करीत आहेत. टीम इंडियासाठी टी-२० विश्वकरंडकाआधी ही डोकेदुखी ठरत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिल्या लढतीदरम्यान जास्त प्रमाणात दव नव्हते. गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक हात सुके करण्यासाठी टॉवेलचा वापरही करीत नव्हते. त्यामुळे या पराभवाला दवाला जबाबदार धरून चालणार नाही. भारतीय संघाने गोलंदाजी बरोबर केली नाही. ही सत्यस्थिती आहे, असे गावसकर या वेळी स्पष्टपणे म्हणाले.

भुवनेश्वरकुमारने पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या तीन देशांविरुद्धच्या मागील तीन लढतींमध्ये धावाच धावा दिल्या आहेत. त्याने या तीन देशांविरुद्ध टाकलेल्या १८ चेंडूंमध्ये ४९ धावा दिल्या आहेत. त्याच्यासारख्या अनुभवी गोलंदाजाकडून अशी कामगिरी योग्य नव्हे.

बुमरा आल्यावर परिस्थिती बदलेल

जसप्रीत बुमरा याच्या खांद्यावर भारतीय गोलंदाजीची मदार आहे. दुखापतीमुळे तो बाहेर आहे. त्याचे संघात पुनरागमन झाल्यानंतर परिस्थिती बदलेल. तो सुरुवातीला विकेट घेतो, त्यामुळे धावसंख्येला ब्रेक लागतो. सध्या भारताला सुरुवातीला विकेट घेता येत नाहीत. कॅमरून ग्रीनने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करीत कांगारूंच्या विजयाची पायाभरणी केली, असे गावसकर पुढे सांगतात.

रवी शास्त्री यांची क्षेत्ररक्षणावर टीका

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणावर टीका केली. ते म्हणाले, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारतीयांचे क्षेत्ररक्षण निराशाजनक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Factory Gas Leak: फूड फॅक्टरीत अमोनिया गॅस गळतीचा भीषण कहर! ७ महिला कामगारांचा मृत्यू, ६७ लोकांची प्रकृती गंभीर, चौकशीचे आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यासह देशभरात आज नीट परीक्षा पार पडल्या, परीक्षा केंद्रावर गोंधळ नाही

Fathers Day Health Alert: फादर्स डे २०२६ ; आजचा पिता शांतपणे तणाव सहन करतोय, उच्च रक्तदाब ठरतोय मोठा आरोग्याचा धोका

Tech Tips : कुणीतरी गुपचुप तुमच्या चॅट किंवा फोटोचा स्क्रीनशॉट घेतय? ओळखायची खतरनाक ट्रिक, 90% लोकांना नाही माहिती

Education Policy: संशोधन-विकासात आत्मनिर्भरतेशिवाय प्रगती नाही; सीओईपी स्थापना दिनी लीला पूनावालांचे आवाहन

SCROLL FOR NEXT