U-19 World Cup esakal
क्रीडा

U-19 World Cup IND vs BAN: भारत - बांगलादेशचे कर्णधार भिडले; पंचांनी मध्यस्थी केली म्हणून...

भारत - बांगलादेश सामन्यावेळी राडा; Video होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

U-19 World Cup India vs Bangladesh : 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये आज भारताने आपली मोहीम सुरू केली. गतविजेत्या भारताचा आज पहिलाच सामना हा कडवट बांगलादेश सोबत होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकात 7 बाद 251 धावा केल्या. कर्णधार उदय सहारनने 64 धावांची खेळी करत महत्वाचे योगदान दिलं. तर सलामीवीर आदर्श सिंगने 76 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचली.

दरम्यान, सामन्यावेळी भारताचा कर्णधार उदय सहारन आणि बांगलादेशचा कर्णधार महफिजूर रहमान राबीसोबत वाद झाला. उदय आणि अरिफुल इस्माल हे एकमेकांसमोर आले होते. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार महफिजूर रहमान राबी देखील मधे पडला होता. अखेर प्रकरण वाढत असल्याचं पाहून पंचांनी मध्यस्थी करत दोन्ही देशांच्या खेळाडूंना बाजूला केलं. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

त्यानंतर अजून एक घटना घडली. बांगलादेशचे खेळाडू भारतीय खेळाडूंना आक्रमकपणे सेंड ऑफ देताना दिसले.

सामन्याबद्दल बोलायचं झालं नाणेफेक जिंकून बांगलादेशने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरूवात खराब झाली. अर्शीन कुलकर्णी (7) आणि मुशीर खान (3) हे स्वस्तात बाद झाले.

मात्र यानंतर सलामीवीर आदर्श सिंह आणि कर्णधार उदय सहारन यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचली. आर्दशने 76 धावांची तर उदयने 64 धावांची खेळी केली.

यानंतर आलेल्या प्रियांशू मोलिया आणि अरवले अवनिश यांनी प्रत्येकी 26 तर सचिन धसने 26 धावांचे योगदान दिलं. बांगलादेशकडून मारूफ म्रिधाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT