virat kohli Twitter
क्रीडा

Virat Kohli: 'दोन फायनल खेळलो पण...', विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकला पण...

Kiran Mahanavar

Virat Kohli : कर्णधार म्हणून विराट कोहलीने टीम इंडियाला परदेशात मोठे यश मिळवून दिले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. मात्र आयसीसी ट्रॉफी न जिंकल्याने त्याच्यावर टीकाही झाली होती. गेल्या वर्षी त्याने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर रोहित शर्माकडे संघाची कमान आली.

विराट कोहलीने आता त्याच्या कर्णधारपदाबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार कोहली म्हणाला की, एक कर्णधार म्हणून त्याने संघाला 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये नेले, तरीही त्याची गणना अयशस्वी कर्णधार म्हणून केली जाते.

आरसीबी पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहली म्हणाला, माझ्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तसेच 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला. तरीही मला अपयशी कर्णधार मानले जात होते. स्पर्धा वेळोवेळी होत राहतात, पण संघाची संस्कृती दीर्घकाळ टिकून राहते. अशी संस्कृती संघात रुजवण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.

एक खेळाडू म्हणून मी एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यामुळे मी जे काही साध्य केले त्यात मी आनंदी आहे. कोहली 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग होता. एमएस धोनीने दोन्ही स्पर्धांचे नेतृत्व केले.

विराट कोहली पुढे म्हणाला, 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्या 2 कसोटीत पराभव झाल्यानंतर संपूर्ण संघ निराश झाला होता. तिसरा कसोटी सामना पर्थ येथे होणार होता. तिथली खेळपट्टी खूप अवघड मानली जाते. अशा परिस्थितीत कदाचित आमच्यासाठी इथे संधीच नव्हती. त्यावेळी माझी वनडेत 8 शतके होती. अशा परिस्थितीत मी काहीतरी करू शकतो, असा विचार मनात आला. मी पहिल्या डावात 48 आणि दुसऱ्या डावात 75 धावा केल्या. मी हे करू शकलो कारण माझा स्वतःवर विश्वास होता. ती माझी महत्त्वाची खेळी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT