Virat Kohli
Virat Kohli  esakal
क्रीडा

टी 20 चे नेतृत्व सोडलं अन् वनडेत ते गमावलं, विराटने सांगितले काय काय घडलं?

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : गेल्या दहा पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या विराट - रोहित वादावर अखेर विराट कोहलीने (Virat Kohli) प्रतिक्रिया दिली. याचबरोबर विराट कोहलीने ज्यावेळी त्याने टी 20 (T20 Cricket) संघाचे नेतृत्व सोडले त्यावेळी बीसीसीआयबरोबर (BCCI) झालेल्या चर्चेदरम्यान काय काय झाले होते याचा खुलासा देखील केला. विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 चे नेतृत्व स्वतःहून सोडले. दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (BCCI President Sourav Ganguly)याबबात बोलताना म्हणाला होता की मी विराट कोहलीला संघाचे नेतृत्व सोडू नको असे सांगितले होते.

आजच्या पत्रकार परिषदेत (Press Conference) विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 कर्णधारपद (Virat Kohli Captaincy) सोडताना बीसीसीआय बरोबर काय चर्चा झाली याचा देखील खुलासा केला. विराट कोहलीने सांगितले की, ज्यावेळी मी टी 20 संघाचे (T20 Team) नेतृत्व सोडले त्यावेळी बीसीसीआय आणि माझ्यामधील संवादात कोणताही अडचण निर्माण झाला नाही. विराट म्हणाला, 'ज्यावेळी मी बीसीसीआयला टी 20 संघाचे नेतृत्व सोडत असल्याचे सांगितले त्यावेळी हा निर्णय चांगल्या प्रकारे स्विकारला गेला होता. त्यात कोणताही अडचण निर्माण झाली नाही. मला सांगण्यात आले की हा एक भविष्यासाठी महत्वाचा निर्णय आहे.'

विराट पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी मी माझा निर्णय सांगितला त्यावेळी मी एकदिवसीय आणि कोसटी संघाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले होते. माझ्या बाजूने माझे म्हणणे मी स्पष्टपणे सांगितले होते. पण, बीसीसीआय अधिकारी आणि निवड समितीला मी हेही सांगितले होते की जर तुम्हाला वाटते की मी इतर फॉरमॅटमध्ये (ODI & Test) नेतृत्व करु नये तर याला माझी काही हरकत नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT