wasim jaffer sakal
क्रीडा

Wasim Jaffer : निवड समितीच्या धडाकेबाज निर्णयांवर वसीम जाफरला आली ‘चक्कर’

एकाच दिवशी 4 संघ आणि तिन्ही कर्णधारांची घोषणा पाहून...

Kiran Mahanavar

wasim jaffer : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी तर बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 विश्वचषकानंतर भारत न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. यादरम्यान भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी दोन देशांच्या दौऱ्यासाठी 4 संघांची घोषणा केली आहे. एकाच दिवशी 4 संघ आणि तिन्ही कर्णधारांची घोषणा पाहून वसीम जाफरला चक्कर आली आहे. खरंतर त्याने ही गोष्ट आपल्या एका मजेशीर ट्विटद्वारे सांगितली आहे.

बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी भारताच्या 4 संघांची घोषणा झाल्यानंतर जाफरने हेरा फेरी या बॉलीवूड चित्रपटाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर लिहिले की, आता मला चक्कर येत आहे. वसीम जाफरने पहिल्यांदाच इतके मजेदार ट्विट केले नाही. याआधीही तो सातत्याने असे प्रकार करत आला आहे. क्रिकेटच्या प्रत्येक मोठ्या बातम्या किंवा घटनेवर त्याने ट्विट केले आहेत.

दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर टीम इंडिया डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. तेथे संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी निवड समितीने सोमवारी भारतीय संघ जाहीर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami ने पहिल्याच रणजी सामन्यात घेतल्या ७ विकेट्स अन् मग अजित आगरकरला दिलं उत्तर; म्हणाला, 'त्यांना काय म्हणायचं ते...'

Banke Bihari Temple Treasure Open: तब्बल पाच दशकांपेक्षाही अधिक काळानंतर उघडला ''भगवान बांके बिहारी''चा रहस्यमयी खजाना!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणाच्याही प्रवासावर कोणतेही बंधन नाही - राम कदम

रांगोळी पहिल्यांदा कधी बनवली गेली? वैदिक-पौराणिक संबंध काय? जाणून घ्या कधीही न ऐकलेला इतिहास

Jalgaon News : सुरक्षितता हीच खरी दिवाळी! बाहेरगावी जाताय, सोने-रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवा; पोलिसांनी सांगितल्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT