West Indies Cricket Team  Twitter
क्रीडा

T20 World Cup : म्हणे, कॅरेबियन ताफा टीम इंडियापेक्षा भारी!

वेस्ट इंडिजच्या संघात अनेक मॅच विनर खेळाडू आहेत. मोठी फटकेबाजी करुन सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता वेस्ट इंडिजच्या संघात आहे.

सुशांत जाधव

T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएई (UAE) आणि (Oman) च्या मैदानात रंगणार असल्याचे आयसीसीने (ICC) स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत टीम इंडियासोबतच वेस्ट इंडिजचा संघ प्रबळ दावेदार असेल, असे मत भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक सबा करीम यांनी व्यक्त केले आहे. वेस्टइंडिज संघाने आतापर्यंत दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे ते देखील प्रबळ दावेदारीच्या शर्यतीत असतील असे साबा करीम यांना वाटते. वर्ल्ड कप संदर्भातील अंदाज वर्तवताना त्यांनी टीम इंडियाला दुसरा दावेदार मानले. भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल असून भारतीय संघ यंदा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकू शकतो, असे ते म्हणाले.

सबा करीम यांनी इंडिया न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये वर्ल्ड कप संदर्भात आपला अंदाज व्यक्त केला. ते म्हणाले की, सध्याच्या घडीला वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रबळ दावेदार संघामध्ये वेस्ट इंडिजला पहिला क्रमांक देईन. माझ्या यादीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या संघात अनेक मॅच विनर खेळाडू आहेत. मोठी फटकेबाजी करुन सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता वेस्ट इंडिजच्या संघात आहे. भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल असून टीम इंडियाही टी-20 वर्ल्ड कपमधील प्रबळ दावेदारापैकी एक आहे, असेही ते म्हणाले.

या दोन संघाशिवाय इंग्लंडच्या संघातही विश्वजेता बनण्याची धमक असल्याचे साबा करीम यांनी म्हटलंय. इंग्लंडचा संघ आयसीसीच्या टी-20 रँकिगमध्ये अव्वलस्थानी आहे. हा संघ देखील प्रबळ दावेदारांच्या शर्यतीत असेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. इंग्लंडच्या संघाने व्हाईट बॉलवर खेळताना कमालीची रणनिती आखलीये. हा संघही संतुलित दिसतो. त्यांनाही टी-20 वर्ल्ड कप उंचावण्याची संधी आहे.

वेस्ट इंडिजचा संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील गतविजेता आहे. 2016 मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी बाजी मारली होती. त्यानंतर 5 वर्षानंतर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. भारतामध्ये होणारी स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युएई आणि ओमनमध्ये पार पडणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आयपीएलमधील उर्वरित सामने युएईच्या मैदानातच रंगणार आहेत. भारतीय संघाला याचा कितपत फायदा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

Jantar Mantar Season 2: जंतर-मंतरचा ‘सीजन-२’ लवकरच! अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; यावेळी काय असणार? सौरव दासांनी सांगितला प्लॅन

मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; ५२७ पूरग्रस्तांचे रेस्क्यू, मुख्यमंत्र्यांकडून २४ तास मॉनिटरिंग

वसू आत्याची खेळी यशस्वी होणार! नंदिनीच्या खोट्या गरोदरपणाचं सत्य सगळ्यांसमोर येणार; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT