Why Avesh Khan Has Been Released by BCCI From India's Test Squad For England Series cricket news in marathi  sakal
क्रीडा

Ind vs Eng : BCCI ने आवेश खानला टीम इंडियातून अचानक का काढले बाहेर? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Kiran Mahanavar

India's Test Squad For England Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आवेश खानलाही संधी दिली होती. आवेशचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हैदराबाद कसोटीपूर्वी त्याला सोडले आहे. वृत्तानुसार, आवेशला रणजी ट्रॉफीसाठी सोडण्यात आले आहे. तो रणजीमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो.

आवेश खान भारताकडून टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळला आहे. आता त्याला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळणार होती. मात्र त्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला सोडले आहे. मात्र, तो लवकरच परत येऊ शकतो.

आवेशने भारतासाठी 8 वनडे सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. त्याने 20 टी-20 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत. आवेशला भारताच्या 16 सदस्यीय संघात स्थान मिळाले. मात्र आता त्याला कसोटी संघातून मुक्त करण्यात आले आहे.

आवेशला रणजी ट्रॉफीसाठी सोडण्यात आले आहे. रणजी ट्रॉफी 2023-24 मधील मध्य प्रदेशचा पहिला आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला होता. संघाने तिसऱ्या सामन्यात दिल्लीचा 86 धावांनी पराभव केला.

याआधी विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. वैयक्तिक कारणांमुळे तो हैदराबाद कसोटीत खेळत नाहीये. कोहलीच्या जागी टीम इंडियाने रजत पाटीदारचा संघात समावेश केला आहे. मात्र, पाटीदारला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT