FIFA World Cup India Participation  esakal
क्रीडा

FIFA World Cup साठी भारताचा फुटबॉल संघ पात्र झाला होता पण...

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup India Participation : जगात सर्वात जास्त बघितली जाणारी स्पर्धा म्हणजे फिफा फुटबॉल वर्ल्डकप (Fifa WorldCup) स्पर्धेला कतारमध्ये सुरुवात झाली आहे. मेस्सी, रोनाल्डो, नेमार यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या या स्पर्धेसाठी यंदा ३२ देश पात्र झालेत. पण भारताचे नाव या स्पर्धेत दूर-दूरवर दिसत नाही आहे. असं का? तुम्हालाही हा प्रश्न कधी ना कधी पडला असेलच...आतापर्यंत २२ वेळा फुटबॉल वर्ल्डकपची स्पर्धा झालीय. मात्र भारतीय फुटबॉल संघाला (indian football team) एकदाही या स्पर्धेत क्वालिफाय होता आलेलं नाहीये. पण भारताला या स्पर्धेत खेळण्याची अजिबातच संधी मिळाली नव्हती का? तर असं नाहीये.

1950 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत (Fifa WorldCup) भारतीय संघाला सहभागी होण्याचं आमंत्रण मिळालं होतं. मात्र भारतानेच (all india football federation) या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला. यामागे काही विचित्र गोष्टी कारणीभूत ठरल्या होत्या. कारण या वर्ल्डकपला जेवढी आता प्रसिद्धी मिळते तेवढी त्याकाळी मिळत नव्हती, शिवाय ऑलिम्पिक स्पर्धेमध्येही फुटबॉलचा समावेश असल्यामुळे भारताच्या फुटबॉल महासंघाने ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याच्या नावाने पैसे वाचविण्याचं कारणं देत या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला.

तर या स्पर्धेत भाग न घेण्यामागे आणखी एक हास्यास्पद कारणसुद्धा दिलं जाते. ते म्हणजे भारतीय फुटबॉलपटूंना अनवाणी खेळण्याची सवय होती. मात्र फुटबॉल वर्ल्डकपमध्ये शूज न घालता खेळण्याची परवानगी मिळत नसल्याने भारताने या स्पर्धेतवर बहिष्कार टाकला. आता हे दुसरं कारण कितपत खरं आहे हे कोणालाच माहित नाही पण त्यानंतर आजपर्यंत तब्बल १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला एकाही वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र होता आलेलं नाहीये.

बायचुंग भुतिया असो किंवा सुनील छेत्री, भारताच्या प्रत्येक खेळाडूने आपल्या देशाला फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये खेळता यावं यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र पात्र होण्याचं तर सोडाच पण त्याआधी होणाऱ्या पात्रता फेरीमध्येही भारताला चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. दर चार वर्षांनी जेव्हा हा फुटबॉलचा हा कुंभमेळा भरतो तेव्हा 1950 ला झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सहभाग न घेता केलेली भारताची ती चूक नेहमी लक्षात राहते.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT