Oranges
Oranges sakal
लाइफस्टाइल

Fruits in Breakfast: ​नाश्त्यात चुकूनही खाऊ नका ही फळे, नाहीतर...

Aishwarya Musale

शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी फळे खाणे खूप गरजेचे आहे. फळांमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. आजकाल आपल्या नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करण्याचा ट्रेंड आहे आणि काही लोक ते मोठ्या उत्साहाने फॉलो देखील करतात.

पण तुम्हाला माहीत आहे का की अशी काही फळे आहेत ज्यांचा तुमच्या नाश्त्यामध्ये समावेश करू नये.हे आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. तुम्हीही असे करत असाल तर काळजी घेण्याची गरज आहे.नाश्त्यात कोणत्या फळांचा समावेश करू नये हे जाणून घेऊया.

केळी

नाश्त्यात केळीचा समावेश करण्याची चूक करू नका. इतर फळांपेक्षा केळीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. केळीमधील कर्बोदके त्यांच्या कॅलरीजपैकी 93 असतात.

नारळ

काही लोक नारळाला पोषक आहार मानतात पण तसे नाही. एका कप किसलेल्या नारळात २८३ कॅलरीज असतात. म्हणूनच हे फळ जड मानले जाते.

संत्रा

नाश्त्यामध्ये संत्र्याचा समावेश करू नये. यामध्ये अॅसिडिटीचे प्रमाण आढळून येते, ज्यामुळे तुमचे दात खराब होऊ शकतात. ते रिकाम्या पोटी खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पोटदुखी, पेटके यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

टरबूज

टरबूज हे उन्हाळ्यातील अत्यंत आवडते फळ आहे. हे आपले शरीर हायड्रेट ठेवते. हे फळ खाल्ल्याने शरीराला कोणतीही हानी होणार नाही, परंतु त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला लवकरच भूक लागण्याची शक्यता आहे.

आंबा

फळांचा राजा आंबाही उन्हाळ्यात भरपूर खाल्ला जातो. पण एक कप आंब्यामध्ये 100 कॅलरीज असू शकतात. याशिवाय यात २३ ग्रॅम साखर असते. म्हणूनच नाश्त्यात आंबा खाणे हा आरोग्यदायी पर्याय असू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs BSP: खेळ राजकारणाचा! भाजप नेत्याच्या लेकाला मायावतींच्या पक्षाचे तिकीट

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

SCROLL FOR NEXT