लाइफस्टाइल

Corona Effect: काठीच्या सहाय्याने घातल्या एकमेकांना वरमाला

कोरोनाची भीती; काठीच्या सहाय्याने वरमाला घालत बांधली लगीनगाठ

शर्वरी जोशी

कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात पाय पसरले आहेत. यात भारतदेखील अपवाद नाही. आतापर्यंत देशात अनेकांना कोरोनाची लागण झाली असून या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून वारंवार त्रिसुत्री नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यात सोशल डिस्टंसिंग बाळगणे, मास्क घालणे, हात सतत धुणे अनिर्वाय आहे. मात्र, एका लग्नात नवरदेव व नववधूने सोशल डिस्टंसिंगचं भलतच मनावर घेतल्याचं पाहायला मिळालं. या दोघांनीही चक्क काठीच्या सहाय्याने एकमेकांना वरमाला घातली. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेत आला असून अनेकांना हसू अनावर झालं आहे.

कोरोनाचं संकट असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यात लग्न सोहळ्यात २५ माणसांची उपस्थिती निश्चित करण्यात आली असून सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं सक्तपणे सांगण्यात आलं आहे.त्यामुळे एका लग्नात नवरा-नवरीने कोविड गाइडलाइन्सच तंतोतंत पालन केल्याचं दिसून आलं.

आयपीएस ऑफिसर दीपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून यात स्टेजवर नववधू व नवरदेव दिसत आहेत. विशेष म्हणजे त्या दोघांनी एकमेकांना चक्क काठीच्या सहाय्याने वरमाला घातल्या. त्यामुळे जुगाडवाली शादी असा हॅशटॅग ट्रेण्ड होऊन हा व्हिडीओ सध्या सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवले पत्र

SCROLL FOR NEXT