Eating roti at night
Eating roti at night  esakal
लाइफस्टाइल

Eating Roti at Night : रात्रीच्यावेळी चपाती खाणे चांगलं की वाईट?

Pooja Karande-Kadam

Eating roti at night side effects : जेवण जेवणाच्या पद्धतींबाबत अनेकदा दुमत पाहायला मिळतं. परंपरेनुसार चपाती, भाजी, भात आणि आमटी हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात. भारतीय पौष्टिक आहाराच्या नियमानुसार एकाच ताटात हे जेवण वाढलं जात आहे. तर नव्या ट्रेंडनुसार चपाती, भात या गोष्टी वर्ज्य केल्या जातात.

आहार शास्त्रानुसार, रात्रीच्यावेळी जड अन्न खाल्ल्याने आपण सुस्तावतो. यामुळे डायटी हलका घेण्यास सांगण्यात येते. पण, तुम्हाला चपाती भाजी या गोष्टी खाव्याच लागतात. त्यामुळेच आज आपण जाणून घेऊयात की, रात्रीच्या वेळी चपाती खावी की नाही?

तुम्हीही रात्री चपाती खाता का? त्यामुळे आपल्यापैकी बहुतेक जण हो म्हणतील. पण रात्री चपाती खाणं हानिकारक ठरू शकतं का? तर, आहार तज्ञांचा असा विश्वास आहे की चपातीमध्ये कॅलरी आणि कार्ब दोन्ही जास्त असतात.

अशावेळी रात्री ते खाणं थोडं जड होऊन बसतं. याशिवाय जेव्हा शरीर चपाती पोटात जाते तेव्हा ती साखर निर्माण करते. जे झोपल्यानंतर रक्तात जाऊ शकते आणि रात्री चपाती खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

याचे काही दुष्परीणामही आपल्याला दिसू शकतात.

  • चपातीमुळे वजन वाढू शकते

  • चपातीमुळे साखर वाढते

  • पचनसंस्था बिघडते

वजन वाढण्यास कारणीभूत

एका छोट्या चपातीमध्ये ७१ कॅलरीज असतात. त्यामुळे रात्री २ चपाती खाल्ल्यास १४० कॅलरीज मिळतात. यानंतर तुम्ही कोशिंबीर आणि भाज्या देखील खाणार आहात, ज्यामुळे तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट्स अधिक वाढतील आणि तुमचं वजन झपाट्याने वाढू शकतं. यातही जर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर चालत नसाल तर ते तुमच्यासाठी अधिक हानिकारक ठरू शकतं.

चपातीमुळे साखर वाढते

रात्री चपाती खाल्ल्याने आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण वेगाने वाढू शकते. यामुळे मधुमेह आणि पीसीओडी समस्या असलेल्या लोकांना अधिक त्रास होऊ शकतो. खरं तर, चपाती रक्तातील साखरेची वाढ वाढवते, ज्यामुळे इन्सुलिन उत्पादनावर परिणाम होतो आणि ही साखर जाऊन शरीराच्या इतर भागांना हानी पोहोचवू शकते.

पचनसंस्थेवर परिणाम होते

चपाती मध्ये साधे कार्ब असतात जे आपली पचन संस्था खराब करू शकतात. इतकेच नाही तर यामुळे आपल्या आतड्यांसंबंधी हालचालींवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्री ब्रेडऐवजी फायबरयुक्त पदार्थ खा जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि लवकर पचतातही.

त्यामुळे हे सर्व तोटे लक्षात घेऊन रात्री २ पेक्षा जास्त चपाती खाऊ नये. त्याऐवजी, आपण जास्तीत जास्त फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे, जे आपल्या आरोग्यासाठी बर्याच प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

चपाती रात्री का खाऊ नये

चपाती खाण्याची एक विशिष्ट वेळ असते. चपातीमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी आणि कार्ब्स आढळतात. रात्री चपाती खाल्ल्याने पचायला अधिक वेळ लागतो. तसंच रात्री चपाती खाल्ल्याने साखरेची पातळी वाढण्याचा धोकाही असतो. त्यामुळेच चपात रात्री खाऊ नये

मग चपाती कधी खावी

चपाती दुपारी खाणे अधिक योग्य ठरते. शरीराला आवश्यक असणारी कॅलरी योग्य मिळते आणि त्याशिवाय दुपारच्या वेळी आपल्या शरीराची हालचाल अधिक प्रमाणात होत असते आणि चपाती लवकर पचू शकते. मात्र चपाती योग्य प्रमाणातच खावी.

चपाती किती खावी

तुम्ही जर चपाती खाणार असाल तर साधारण संध्याकाळी लवकर जेवावे आणि जेवणात २ पेक्षा अधिक चपाती खाऊ नये. तसंच चपाती खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही चालावे. संध्याकाळी ७ ते ८ मध्ये तुम्ही तुमचे रोजचे जेवण जेवावे. यामुळे चपाती पचायला योग्य वेळ मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT