Relationship
Relationship Esakal
लाइफस्टाइल

नातं संपवावे की नाही, कन्फ्यूज आहात? निर्णय घेण्यापूर्वी या ४ गोष्टींचा विचार करा

सकाळ डिजिटल टीम

Relationship Tips in Marathi: नातं बनवणे खूप सोपे आहे पण ती निभावणे खूप अवघड आहे. नात्यामध्ये वाद होणे साधरण गोष्ट आहे पण ते वाद वाढू नये हे प्रत्येक जोडप्यावर अवलंबून असते. जेव्हा नात्यामध्ये जोडीदार एकमेकांना दुखावतात तेव्हा त्यावर पुन्हा मनवून, समजावून प्रेमाची फुंकरही मारावी लागते. छोटे-मोठे वाद किंवा गैरसमज दूर तर होतात पण विषय वाद जेव्हा मर्यादेपलिकडे जातात तेव्हा त्या नात्यामध्ये राहणे अवघड होत आहे. अशा वेळी जोडीदारांना आपले मार्ग वेगळे करावे की नाही याबाबत ते कन्फ्यूज असतात. कदाचित ते चूकीचा निर्णय तर घेत नाही ना. किंवा रिलेशनशीप संपण्याविण्यासाठी घाई तर नाही करत ना. नाते संपविण्याचा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नात्यातील प्रेम संपले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे.

वारंवार रुसवा,फुगवा आणि मनावणे होत

कित्येकदा पार्टनरसोबत वाद होत मग त्याला प्रेमाने मनवावे लागते हेच नात्याची सुंदरता असते. पण प्रत्येक दिवशी जर रुसणे-फुगणे जर एखाद्याची सवय झाली असेल तर समोरच्याला त्याचा त्रास होऊ शकतो. कित्येकदा पार्टनर शुल्लक कारणावरून रुसून बसतात आणि चूक नसले तरी तुम्हाला सॉरी बोलावे लागते. आणि त्यांना वांवर मनावावे लागते आणि आपल्या नात्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. रुसणे-मनावणेजर संपतच नसेल तर तुम्ही एकदाचा हा वाद मिटवू योग्य असेल.

प्रत्येकवेळी तडजोड -

जेव्हा नात्यामध्ये प्रेमाऐवजी प्रत्येकवेळी तडजोड (Compromise) करावी लागत असेल तर ते नाते कोणत्याही कामाचे नसते. पार्टनरच्या हिशोबने वागणे, फिरणे, कोणाशीही गप्पा मारणे.. जर तुम्ही या सगळ्या गोष्ट पार्टनरच्या म्हणण्यानुसार करत असाल तर ही कमिटमेंट(Commitment) नाही तर गुलामी आहे. काही काळानंतर अशी नाती ओझ वाटू लागतात. त्यामुळे बरे होईल की तुम्ही या नात्यातून मु्क्त व्हा.

नात्यामध्ये वाद खूप वाढला असेल

जर एखाद्या व्यक्तीसोबत नाते टिकविण्यासाठी तुम्हाला वारंवार रडावे लागत असेल तर असे नातं टिकविण्याचा काय अर्थ? रिलेशनशीपमध्ये अशा नात्यामध्ये राहायला पाहिजे जिथे तुमच आयुष्यात आनंद असेल दुख नाही. नात्यामध्ये वाद वाढणे म्हणजे तुमचे नातं तुटण्याची वेळ आली आहे. जेव्हा रिलेशनशीपमध्ये दोघांचा आनंद मिळविण्याचा प्रयत्न करत नसतील तेव्हा नाते टिकत नाही.

नाते टिकविण्यासाठी जबाबदारी फक्त तुमची नाही:

जेव्हा दोन लोक कोणत्याही नात्यामध्ये असतात तेव्हा योग्य प्रकारे निभाविण्यासाठी आणि भविष्यामध्ये त्या नात्याला नाव देणे दोघांची जबाबदारी असते. जर फक्त केवळ एक जण हे काम करत असेल तर या नात्यामधअये कोणतेही भविष्य नाही. घरातल्यासोबत कसे बोलायचे आहे, लग्न कसे करणा, घरच्यांसोबत लग्नाची बोलणी कशी करायची जर या गोष्टींचा विचार दोघांऐवजी फक्त एकच जण करत असेल तर समजूव घ्या की पुढे जाऊ नाते तुटू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT