Janmashtami 2023 esakal
लाइफस्टाइल

Janmashtami 2023 : भारतातल्या या मंदिरात आहे चमत्कारीक श्रीकृष्ण; नैवेद्याला उशीर झाला की मूर्तीचा बदलतो आकार

बालगोपालांचे हे मंदिर अत्यंत चमत्कारिक आहे

Pooja Karande-Kadam

Janmashtami 2023 : अबालवृद्धांचा सण असलेला कृष्णजन्माष्टमी अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. गावोगावी तरूण मुलं गोपाळकाल्यासाठी दहीहंडीचे थर रचत आहेत. तर, कृष्णांच्या मंदिरांमध्येही जोरदार तयारी सुरू आहे. सगळ्यांनाच माहितीय की, श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्र १२ वाजता झाला होता.

त्यामुळेच ६ आणि ७ सप्टेंबर अशा दोन्ही दिवशी कृष्णजन्मोत्सव साजर केला जातो.  दरवर्षी दोन दिवस हा सोहळा असतो. जन्मोत्सवानंतर पुढील आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडी स्पर्धाही भरवल्या जातात.

देशभरात भगवान कृष्णांची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकीच एका मंदिराबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. या मंदिरात भगवान श्री कृष्ण चमत्कार दाखवतात, अशी मान्यता आहे. ती काय आहे आणि नेमका कोणता चमत्कार दाखवतात हे पाहुयात.  

बालगोपालांचे हे मंदिर अत्यंत चमत्कारिक आहे. अनेक भाविकांच्या श्रद्धेचे हे केंद्र मानले जाते. या मंदिराच्या दर्शनासाठी लोक ठिकठिकाणाहून येत असतात. श्री कृष्णांचे हे मंदिर केरळ राज्यातील कोट्टायम जिल्ह्यातील तिरुवरप्पू गावात आहे. या मंदिराची वेगळी गोष्ट म्हणजे बालगोपालांच्या मूर्तीला खूप भूक लागते. त्यामुळे येथील कृष्णाला सतत नैवेद्य दाखवला जातो.

काही कारणाने जर नैवेद्य देण्यास उशीर झाला, किंवा तो दिला गेला नाही तर श्री कृष्णभगवानांची मूर्ती आकार बदलू लागते. जसे, एखाद्या उपाशी व्यक्तीचे शरीर बारीक होते, पोट आत गेल्यासारखे वाटते. अगदी तसेच या मुर्तीबाबत घडतं. (Shri Krishna)

भोग वेळेत न दिल्यास ही मूर्ती बारीक होते. सुमारे 1500 वर्षे जुन्या या मंदिरात भगवान श्रीकृष्ण देवांना दहा वेळा नैवेद्य दाखवला जातो. असे म्हणतात की ताटात ठेवलेला प्रसाद हळूहळू कमी होऊ लागतो.  

देवांना इतकी भूक का लागते?

जेव्हा भगवान कृष्णांनी कंसाचा वध केला. तेव्हा ते खूप थकले होते. त्यांना भूक लागली होती. तेव्हापासून इथे भगवानची मूर्ती भुकेने व्याकूळ राहते अशी धार्मिक मान्यता आहे. कृष्णदेवांचे तेच रूप या मंदिरात विराजमान आहे.

त्यामुळेच येथील मुर्तीला नैवेद्य द्यावा लागतो. भगवानाला अन्न अर्पण करण्यास उशीर झाला तर मुर्तीचा आकार बदलतो.

मंदिर फक्त 2 मिनिटांसाठी बंद होते

प्रत्येक मंदिर उघडण्याची आणि बंद करण्याची स्वतःची वेळ असते. केरळमधील या बालगोपाल मंदिराप्रमाणेच श्रीकृष्णाची मूर्ती फक्त 2 मिनिटे झोपते असे मानले जाते. पुजाऱ्याला मंदिराच्या चाव्यासोबत कुऱ्हाडही दिली जाते. जर काही कारणाने दरवाजे उघडले गेले नाहीत.

तर, ते तोडले जाते. कारण, कोणत्याही परिस्थितीत हे मंदिर बंद ठेवायचे नाही असा नियमच आहे. त्यामुळे या मंदिरातील पुजाऱ्यांना चावीसोबतच कुऱ्हाडह दिली जाते.ही प्रथा वर्षानुवर्षे पाळली जात आहे.

ग्रहण काळातही मंदिर बंद होत नाही

ग्रहण काळ सुरू असेल तर अनेक मंदिरे बंद केली जातात. मात्र, या मंदिराची खास गोष्ट म्हणजे ग्रहणाचही या मंदिराचे दरवाजे उघडले जातात. म्हणजे ग्रहणाच्या वेळी मंदिराचे सर्व दरवाजे बंद असतात आणि हे असे मंदिर आहे, जे सदैव उघडे असते.

ग्रहणकाळात देवतांना त्रास होतो, पण श्रीकृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन येथील मंदिराचे दरवाजे उघडे राहतात आणि वेळोवेळी त्यांना नैवेद्य दाखवला जातो. असे मानले जाते की येथे प्रसाद ग्रहण करणाऱ्या व्यक्तीला कधीही अन्नाची कमी भासत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT