भांडण भांडण
लाइफस्टाइल

आई-वडिलांच्या भांडणाचे मुलांवर काय होतात परिणाम? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मुलांच भावविश्व एखाद्या शांत जलाशयासारखे असते. ज्यात आजूबाजूच्या सृष्टीचे प्रतिबिंब पडत असते. एका छोट्याशा दगडानेही त्यावर तरंग उठतात. तसेच मुलांचाही असते. थोड्याशा ताणानेही त्यांच्या भावसृष्टीत खळबळ माजते, तरंग उठतात. मग मनाचा खोल डोह ढवळून निघतो. तिथली शांतता भंग पावते. मनात उलथापालथ होते.

आई-वडिलांचे संबंध सामान्य नसलेल्या घरातली मुलं (०-१२ वर्षांची) खूप अस्वस्थ, केविलवाणी होऊन जातात. मुलांच्या कोवळ्या वयात त्यांना आई-वडिलांची भावनिक जवळीक, त्यांची माया, भरपूर वेळ आणि घरामधले आनंदी वातावरण एवढंच हवे असते. कारण, याच वयातच त्यांची भावनिक, बौद्धिक, शारीरिक वाढ तसेच व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. जर पोषक वातावरण मिळाले नाही तर ही मुलं अकालीच कोमेजून जातात.

आई-वडिलांच्या भांडणाचा मुलांवर वाईट परिणाम होतो. ज्या वयात आनंदी राहायचे, खेळायचे, बागडायचे त्याच वयात त्यांच्यावर मानसिक ताण येतो. सतत भांडत असलेले आई-वडील, त्यांच्यात असलेला अबोला, घरातले बिघडलेले वातावरण यामुळे मुलांच्या सर्वांगीण वाढीस अडथळा येतो. एकमेकांची उणीदुणी काढत असलेले, एकमेकांवर जोरजोरात ओरडणारे आई-वडील बघून या मुलांच्या मनात एक प्रकारची धास्ती बसते. ते सतत भीतीच्या सावटाखाली वावरत राहतात. एक प्रकारची असुरक्षितता त्यांच्या मनात निर्माण होते.

मुलं घरातल्या मोठ्यांचे अनुकरण करत असतात. त्यातूनच शिकतात. लहानपणापासूनच ते नात्यांमधला गोडवा, एकमेकांकरता असलेली काळजी, प्रेम बघत असतील तर नात्यांमधला बळकटपणा त्यांच्या मनात रुजत जातो. मग ही मुलं भविष्यात सुदृढ नात‌ बनवू शकतात. त्यामुळे आपल्याला फुलांना जपायला हवे, त्यांना फुलवायला हवे, तरच सर्वांच्या आयुष्यात आनंदाचा व समाधानाचा बहर येईल.

विविध ताणामुळे समस्यांची निर्मिती

  • मुलांची झोप कमी होते. ते शांत झोपूच शकत नाही

  • दहा अकरा वर्षांची मुलंसुद्धा अंथरूण ओल करतात

  • शाळेत, अभ्यासात त्यांचे लक्ष एकाग्र होत नाही

  • मुलं उदास राहू लागतात

  • एकलकोंडी व्हायला लागतात

  • मित्र-मैत्रिणींपासून तुटत जातात

  • नैराश्याने ग्रासली जातात

नात्यांवरचा विश्वास उडतो

  • मुलं भविष्यात नातं बनवायला घाबरतात किंवा नात्यांबाबतीत नकारात्मकता निर्माण होते

  • बहुतांश वेळा मुलं भविष्यात नात्यांमध्ये पूर्णपणे समर्पित होऊ शकत नाहीत

  • लहानपणापासून मनात घर करून बसलेली भीती, असुरक्षितता वाढते

  • मुलांना स्वतःच्या कोषात रहायला आवडते

  • मुलं घुमी होतात, स्वतःला व्यक्त करायला घाबरतात

  • मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलू शकत नाही

  • आत्मविश्वासाचा अभाव दिसतो

  • मुलं न्यूनगंडाने पछाडल्या जातात

  • काही केसेसमध्ये मुलं आक्रमक होतात

  • मुलं एखादा गुन्हा करायलाही मागे पुढे पहात नाही

काय करावे?

  • आई-वडिलांनी शक्यतो आपापसातले वादविवाद परस्पर सामंजस्याने मिटवावेत

  • मुलांच्या चांगल्यासाठी दोघांनीही थोडी माघार घ्यावी

  • आपापले अहंकार बाजूला ठेवावे

  • मुलांसमोर भांडणं टाळा

  • घटस्फोटाचा निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election साठी भाजप-शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला!

Dhurandhar Craze in Pakistan: पाकिस्तानात ‘धुरंधर’ पाहण्याची क्रेझ! बंदी असतानाही लोक कसे पाहतायत चित्रपट?

Kolhapur Property Survey : करवीर तालुक्यात ऐतिहासिक सर्वेक्षण; १३२ गावांतील ४० हजार मिळकतींना युनिक ओळख

Agriculture News : नाशिकमध्ये रब्बी पीकविम्याला थंडा प्रतिसाद! ४ लाख शेतकरी विम्यापासून दूर; काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT