Parenting Tips in Marathi
Parenting Tips in Marathi  
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलांना कधीच या गोष्टी बोलू नका? मुलं जास्तच बिघडतील!

Pooja Karande-Kadam

Parenting Tips : सध्याच्या धावपळीच्या स्पर्धात्मक युगात आधुनिक पालकांचे आपल्या मुलांकडे होणारे दुर्लक्ष एक मोठी समस्या आहे. कारण मुलाला गरज असतानाच जर पालक जवळ नसतील तर अशाने पालक आणि मुलांमधील दुरावा वाढत जाऊन खूप मोठे रूप घेऊ शकतो.

मुलगा आपल्या पालकांचा राग करू शकतो. त्यांच्या मनात आपल्या आई वडिलांविषयी काहीच प्रेम राहणार नाही.

 मुलांकडून काही चूक झाली तर पालकांनी त्यांना प्रेमाने समजावून सांगावे आणि त्यांची टिंगल करू नये. असे केल्याने मुलांना त्रास होऊ शकतो. सुधारण्याऐवजी खराब होऊ शकतात. मुलांना टोमणे मारणे टाळा आणि या गोष्टींचे पालन करा.

 मुलांवर पालकांचे प्रेम सर्वात खरे असते. प्रत्येक मुलाला त्यांच्या पालकांचे लक्ष वेधून घ्यायचे असते. अनेकवेळा पालक मुलांना चुकीच्या वागणुकीसाठी टोमणे मारतात, तरीही प्रेम कमी होत नाही. अर्थात हे सर्व मुलांच्या चांगल्या संगोपनाचा एक भाग आहे.

मात्र, अनेकवेळा पालक रागावतात आणि मुलांना असे टोमणे देऊ लागतात. ज्याचा विपरीत परिणाम तुमच्या मुलांवर दिसून येतो. हे टोमणे मुलांना दुखावतातच, पण मुलांचे बिघडवतात. तुम्हीही तुमच्या मुलांना असे टोमणे देत असाल तर ही सवय सुधारण्याची गरज आहे. मुलांना कोणते टोमणे टाळावेत ते जाणून घेऊया.

 तू नाटकं करतोय

अनेक वेळा मुलांच्या म्हणण्याप्रमाणे पालक मुलांना वागू देतात. आणि नंतर त्याचा हट्ट करायला लागले की पालक सहज बोलतात नाटकं करणं बद कर, असं त्यांना म्हणू नका.

कारण, नाटक करणे हा शब्द मुलांना दुखवू शकतो. त्यामुळे मुले स्वतःला भावनिकदृष्ट्या कमकुवत समजू लागतात. तुमचं असं बोलणं त्याच्या भावनिक पैलूला अधिक दुखावण्याचे काम करतो. म्हणूनच मुलांच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्या क्रियाकलापांना नाटक म्हणणे टाळा.

मुलांना मूर्ख म्हणू नका

पालक रागावतात आणि आपल्या मुलांना मूर्ख म्हणतात. असे जर तुम्ही मुलाला सांगितले तर त्यांच्या आत्मविश्वासाला तडा देण्याचे काम होते. मूर्ख हा शब्द अपशब्द आहे. असे बोलल्याने मुलाच्या भावना दुखावतात. असे बोलून मुलं स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखू लागतात.

आता मला सहन होत नाहीय

मुले चुका करतात तेव्हा पालक म्हणतात की अशा वाईट सवयी ते सहन करणार नाहीत. पण मुलांना सुधारण्यासाठी असे शब्द बोलणे योग्य नाही. असे केल्याने मुलामध्ये तुमच्याबद्दल भीती निर्माण होते. यानंतर मुलंही पालकांपासून अनेक गोष्टी लपवू लागतात.

तुला काय करायचंय

जेव्हा पालक काहीतरी करतात ज्यावर मुले प्रश्न करतात. यावर पालक म्हणतात तुला काय करायचंय. असे म्हणणे हा आतापर्यंतचा सर्वात वाईट टोमणा आहे. जेंव्हा तुम्ही तुमच्या मुलाला हे बोलता तेंव्हा तो नेहमी स्वतःला चुकीचा समजतो. म्हणूनच मुलाला असे टोमणे देणे टाळले पाहिजे.

तू असे का आहेस

तुमच्या मुलाला इडियट, गिमिक, इडियट अशा शब्दांनी वारंवार हाक मारल्याने मुलाला त्रास होऊ शकतो. असे शब्द तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलासाठी चुकीचे आहेत.

यामुळे मुलांच्या भावना तर दुखावतातच शिवाय त्यांच्यात असुरक्षिततेची भावनाही निर्माण होते. या शब्दांनी मुलांना पुन्हा हाक मारणे म्हणजे त्यांचा आत्मविश्वास तुटणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT