Positive Thoughts  esakal
लाइफस्टाइल

Positive Thoughts : ...अशा पध्दतीने बनवा तुमच्या मनाला स्ट्राँग, मग जग जिंकलच म्हणून समजा

व्यक्तीमत्व विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन फार आवश्यक असतो.

धनश्री भावसार-बगाडे

Personality Development : आपल्या आयुष्यात व्यक्तीमत्वाला फार महत्व असतं. अनेक गोष्टी त्यावरच अवलंबून असतात. असं असलं तरी आपण आतून म्हणजे मनाने किती स्ट्राँग, सकारात्मक आहोत त्यामुळेच तुमचं व्यक्तीमत्व अधिक खुलून उठतं. त्यामुळेच करिअरमध्ये यश, लोकांमध्ये आदर मिळतो. तुम्ही आयुष्यात वेगाने पुढे जाऊ शकतात.

पण काही लोकांच्या बाबतीत असं घडतं की, त्यांचा आत्मविश्वास कमी पडतो आणि ते भीती किंवा दबावात आयुष्य घालवतात. त्यामुळे हे लोक स्वतःला इतरांपेक्षा कमकुवत समजतात. नकारात्मकतेने ग्रासतात. अशावेळी या टिप्स तुम्हाला सकारात्मकता आणि मनाने स्ट्राँग होण्यास मदत करतील.

टोचून बोलणारे

समाजात वावरताना असे खूप लोक भेटतात जे तुम्हाला टोचून, मनाला लागेल असे बोलतात. अशा लोकांना बदलणे कठीण असते. पण तुम्ही अशा लोकांशी बोलणे शक्य तेवढे कमी करा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. जे लोक तुमच्याबद्दल नकारात्मक बोलतात त्यांच्याबद्दल शक्य तेवढा कमीत कमी विचार करा.

चुका मान्य करा

तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती मान्य करा, त्यासाठी इतर कोणाला जबाबदार धरू नका. स्वतःची जबाबदारी घ्या. यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल.

या गोष्टी सर्वात महत्वाच्या

  • कायम आनंदी रहा

  • आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.

  • स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखू नका

  • टेंशन फ्री राहण्याचा प्रयत्न करा.

  • इतरांवर अवलंबून राहू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT