Relationship Tips
Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : नवरा बायकोत भांडण होणं गरजेचं आहे का? भांडणानंतर पुढे येतात 'या' गोष्टी

सकाळ ऑनलाईन टीम

Relationship Tips : कोणत्याही नात्यात जेवढं प्रेम असतं तेवढेच वादही असू शकतात. अशात जोडप्यांमधे भांडण होणे साहाजिक आहे. मात्र भांडण होणेही महत्वाचे आहे असे काही जोडप्यांचे म्हणणे आहे. भांडणानंतर त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या मनातील बऱ्याच गोष्टी कळल्या.

भांडण हे नात्यातील नकारात्मक वाटणारी ही गोष्ट या जोडप्यासाठी खरोखर फायदेशीर ठरू शकते असा विचार तुम्ही केला नसेल. मात्र अनेकदा पती-पत्नीमधील भांडणं नेमकी का होतात, ते तुम्हाला खालील लेखातून कळेलच. चला तर जाणून घेऊया.

एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही किंवा तुम्हाला ती पटली नाही तर तुमच्यात वाद होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच भांडणाला वाचा फुटणार. मात्र तुमचा जोडीदार जर तुमच्या कुठल्याच कृतीवर काहीच रिअॅक्शन देत नसेल तर हे जास्त गंभीर ठरू शकतं. तेव्हा भांडण किंवा वाद होणे एका अर्थाने तुमच्या नात्यातील समजूतदारपणा वाढण्याच्या दृष्टीने चांगले ठरू शकते.

भांडणातून मनातल्या गोष्टी पुढे येतात

रागावलेला माणूस उघडपणे आपला राग व्यक्त करतो. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, जोडप्यांना शांतता राखण्यासाठी गोष्टी लपवून ठेवण्याकडे कल असतो.

मात्र, गोष्टी लपवल्याने त्या सुधारण्याऐवजी नात्यात दरी निर्माण करण्याचे काम करते. जर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली वाटत नसेल, तर ती तुमच्या जोडीदाराला उघडपणे सांगा, तरच तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल.

क्रोध मनात राखून ठेवू नका

भांडणांना नकारात्मकतेने पाहिले जाते आणि ते नातेसंबंधात कटुता आणतात असे म्हटले जाते. मात्र, वाद हा जर योग्य गोष्टींना धरून असेल तर जोडप्याला जवळ आणतो. गोष्टी लक्षात ठेवण्याऐवजी, जेव्हा त्याबद्दल बोलले जाते तेव्हा ते प्रश्न सोडवण्यास मदत करते. तसेच नात्यातील दूरावा कमी होण्यास मदत होते. (Relationship Tips)

जेव्हा जोडप्यामध्ये वाद होतात आणि नंतर दोघे मिळून गोष्टी सोडवतात तेव्हा त्यांच्यातील नाते अधिक घट्ट होते. एवढेच नाही तर त्यांच्यातील परस्पर विश्वासही वाढतो.

कारण या जोडप्याला सर्वात मोठी भीती असते की भांडण झाले तर त्यांच्यात दुरावा निर्माण होईल.(Wife & Husband) मात्र भांडण सोडवत त्यांच्यातील समंजसपणा जेव्हा वाढतो तेव्हा त्यांच्या नात्यात नवा आत्मविश्वास तयार होतो.

लढताना माणसाचे खरे स्वरूप समोर येते. त्याच्या भावनाही बिनधास्तपणे व्यक्त होतात. या गोष्टीमुळे जोडप्याला एकमेकांचे खरे वर्तन समजण्यास मदत होते. यासोबतच ते त्यांच्यातील मतभेदही पुढे येतात. थोडक्यात भांडणाने दूरावा नाही तर नात्यातील समंजसपणा वाढण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT