It is necessary to get married within 30 years; Know these benefits. Esakal
लाइफस्टाइल

Marriage: तिशीच्या आत लग्न करणं गरजेचं आहे का? जाणून घ्या हे फायदे

तिशीच्या आत लग्न कराल तर फायद्यात राहाल, वाचा हे ५ फायदे

Aishwarya Musale

आपल्या देशात प्रेम या भावनेपेक्षा लग्नाला अधिक महत्व आहे. लग्न हे वयात व्हाव असंही अनेकांच म्हणणं असतं. त्यामुळं मुलगा किंवा मुलगी यांचे योग्य वयात लग्न व्हावे असा पालकांचाही अट्टहास असतो.

एखाद्या मुलीचं वय तीसपेक्षा जास्त असेल आणि तिचं लग्न झालं नाही म्हणजे त्या मुलीमध्ये काहीतरी खोट आहे, असं सामान्यपणे समजलं जातं.

सध्या मुला-मुलींना त्यांचं करिअर, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र्य असणं जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळे अनेकजण तिशीनंतर लग्न करण्याचा विचार करतात. पण, तिशीनंतर लग्न झालं तर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं

लग्नासाठी जी परिपक्वता लागते ती वयाच्या २१ वर्षांनंतर तुमच्यात येते. त्यामुळे सरकारने लग्नाचे वय २१ वर्षे निश्चित केले आहे. पण, नात्यात प्रत्येकाला १०० टक्के योग्य जोडीदार मिळतोच असं नाही. तुम्ही जर तिशीच्या आत लग्न केले तर त्याचे पाच चांगले फायदे आहेत.

एकमेकांना समजून घेण्यासाठी योग्य वेळ

तिशीच्या आत लग्न केल्याने मुलींना नवरा आणि सासरच्या लोकांना समजून घेण्यासाठी जास्त वेळ मिळतो. सासू- सासरे सुनेला मुलीप्रमाणे समजून घेतात. तसंच, कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असतो.

कधी कधी सासू सुनेला स्वयंपाक करायला शिकवते. म्हणजेच तुम्हाला नव्या गोष्टी शिकता येऊ शकतात.

(It's the ideal time to get to know one another.)

रोमान्स टिकेल दिर्घकाळ

तिशीच्या आत लग्न केल्याने वैयक्तिक आयुष्याबरोबरच रोमान्सही दिर्घकाळ टिकेल. अशी जोडपी दिर्घकाळ तरूण राहतात. तसेच ती एकमेकांसोबत खूप रोमँटिक असतात.

(The romance will last a long time.)


मुले होण्यासाठी कमी दबाव

कमी वयात तुमचे लग्न झाल्याने घरातलेही लवकर मुलं होऊ देण्यासाठी जबरदस्ती करत नाहीत. वय जास्त असेल तर वर्षाच्या आत मुलं होत नाही म्हणून अनेकजण टोमणे मारतात.

त्यामुळे त्रास होतो तो वेगळाच. उलट, कमी वयात लग्न करणाऱ्या जोडप्यांना नेहमीच मुलांना आरामात जन्म देण्याचा आणि त्यांच्या आयुष्याचा आनंद घेण्याचा सल्ला दिला जातो.

(There is less family pressure to have children.)

जबाबदारीची जाणीव

कमी वयात लग्न केल्याने मुला-मुलींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते. मुलींची मानसिकता आणि परिपक्वता पातळी 21 ते 25 वर्षे वयाच्या मुलांपेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे मुलींना गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतात.

(A sense of responsibility.)

आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी वेळ

उशीरा लग्न केले की मुलींना काहीवेळा करिअरमधून ब्रेक घ्यावा लागतो. पण तुम्ही योग्य वयात लग्न केले तर तुम्हाला पुरेसा वेळ मिळतो. तुम्ही तुमचे काम आणि करिअर पुढे नेऊ शकता. तसेच पती-पत्नी मिळून कोणताही व्यवसाय किंवा कोणतेही काम सुरू करू शकता.

(Time to become financially independent.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT