Marriage Age Of Women esakal
लाइफस्टाइल

भारतात मुलींच्या लग्नाचं वय 21 होतंय, इतर देशांमध्ये कायदेशीर वयोमर्यादा 12

सकाळ डिजिटल टीम

सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करणार असल्याचं कळतंय.

Marriage Age Of Women : मुलींच्या लग्नाच्या वयाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. देशातील मुलींसाठी लग्नाचं कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं (Union Cabinet) मंजुरी दिल्याची माहितीय. मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलेय. यासाठी सरकार सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करणार आहे; पण आपल्याला हे माहितीय, की दुसऱ्या देशांत मुलीचं कायदेशीर लग्नाचं वय किती असतं ते? आम्ही तुम्हाला सांगू..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून (Red Fort) केलेल्या भाषणात पहिल्यांदाच याचा उल्लेख केला होता. मुलींना कुपोषणापासून वाचवायचं असेल, तर त्यांचं लग्न योग्य वेळी होणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले होते. सध्या पुरुषांसाठी विवाहाचं किमान वय 21 आणि महिलांचं 18 वर्षे आहे. आता सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा (Special Marriage Act) आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करून त्याला एक स्वरूप देणार असल्याचं कळतंय.

भारताव्यतिरिक्त (India) उरुग्वेमध्ये (Uruguay) मुलीच्या लग्नाचं कायदेशीर वय 12 आहे. अमेरिका 13 (America), म्यानमार 14, अफगाणिस्तान 15, कॅनडा 16, स्वित्झर्लंड 16, पाकिस्तान 16 (Pakistan), रशिया 16, नेपाळ 18, चीन 20 आणि सिंगापूर 21 (Singapore) असं मुलीचं लग्नासाठी योग्य वय आहे. मात्र, आता भारत सिंगापूरच्या धर्तीवर मुलीचं कायदेशीर लग्नाचं वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा विचार करत आहे, तो प्रस्तावही मंत्रिमंडळात मंजूर झाल्याचं समजतंय. नीती आयोगात जया जेटली यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सनं याची शिफारस केली होती. व्ही. के. पॉल हे देखील या टास्क फोर्सचे सदस्य होते.

टास्क फोर्सची शिफारस काय?

गेल्यावर्षी जूनमध्ये या टास्क फोर्सची (Task Force) स्थापना करण्यात आली होती. गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच टास्क फोर्सनं आपला अहवाल सादर केला होता. पहिल्या मुलाला जन्म देण्याच्यावेळी मुलीचं वय 21 असावं, अशी शिफारस टास्क फोर्सनं केली होती. तसंच लग्नाला होत असलेल्या विलंबामुळं कुटुंब, महिला, मुलं आणि समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असंही टास्क फोर्सनं अहवालात नमूद केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT