Marriage Age Of Women
Marriage Age Of Women esakal
लाइफस्टाइल

भारतात मुलींच्या लग्नाचं वय 21 होतंय, इतर देशांमध्ये कायदेशीर वयोमर्यादा 12

सकाळ डिजिटल टीम

सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करणार असल्याचं कळतंय.

Marriage Age Of Women : मुलींच्या लग्नाच्या वयाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. देशातील मुलींसाठी लग्नाचं कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं (Union Cabinet) मंजुरी दिल्याची माहितीय. मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलेय. यासाठी सरकार सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करणार आहे; पण आपल्याला हे माहितीय, की दुसऱ्या देशांत मुलीचं कायदेशीर लग्नाचं वय किती असतं ते? आम्ही तुम्हाला सांगू..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून (Red Fort) केलेल्या भाषणात पहिल्यांदाच याचा उल्लेख केला होता. मुलींना कुपोषणापासून वाचवायचं असेल, तर त्यांचं लग्न योग्य वेळी होणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले होते. सध्या पुरुषांसाठी विवाहाचं किमान वय 21 आणि महिलांचं 18 वर्षे आहे. आता सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा (Special Marriage Act) आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करून त्याला एक स्वरूप देणार असल्याचं कळतंय.

भारताव्यतिरिक्त (India) उरुग्वेमध्ये (Uruguay) मुलीच्या लग्नाचं कायदेशीर वय 12 आहे. अमेरिका 13 (America), म्यानमार 14, अफगाणिस्तान 15, कॅनडा 16, स्वित्झर्लंड 16, पाकिस्तान 16 (Pakistan), रशिया 16, नेपाळ 18, चीन 20 आणि सिंगापूर 21 (Singapore) असं मुलीचं लग्नासाठी योग्य वय आहे. मात्र, आता भारत सिंगापूरच्या धर्तीवर मुलीचं कायदेशीर लग्नाचं वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा विचार करत आहे, तो प्रस्तावही मंत्रिमंडळात मंजूर झाल्याचं समजतंय. नीती आयोगात जया जेटली यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सनं याची शिफारस केली होती. व्ही. के. पॉल हे देखील या टास्क फोर्सचे सदस्य होते.

टास्क फोर्सची शिफारस काय?

गेल्यावर्षी जूनमध्ये या टास्क फोर्सची (Task Force) स्थापना करण्यात आली होती. गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच टास्क फोर्सनं आपला अहवाल सादर केला होता. पहिल्या मुलाला जन्म देण्याच्यावेळी मुलीचं वय 21 असावं, अशी शिफारस टास्क फोर्सनं केली होती. तसंच लग्नाला होत असलेल्या विलंबामुळं कुटुंब, महिला, मुलं आणि समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असंही टास्क फोर्सनं अहवालात नमूद केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT