Vastu Tips esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips : कधीच रिकाम्या ठेऊ नका या वस्तू; घर कंगाल व्हायला वेळ नाही लागणार!

तुमच्याही बाथरूममधील बादली नेहमीच रिकामी असते का?

Pooja Karande-Kadam

Vastu Tips : पूर्वीच्या काळातील लोक जास्त श्रीमंत नव्हते. पण त्यांच्याकडे समाधान होतं. कुटुंब, सदस्यांचं पाठबळ होतं. आर्थिक चणचण कधीच फार भासली नाही. कारण, जे मिळेल त्यात ते समाधानी होते. पण, सध्याच्या लोकांकडे सर्वकाही आहे तरी ते समाधानी नाहीत.

वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मान्यतेनुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा लहानसहान गोष्टीमुळे माणसाचे नशीब थांबते आणि हळूहळू गरिबीकडे जाते.

या गोष्टींमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन समस्या येऊ लागतात. त्यामुळे जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी या पाच गोष्टी घरात कधीही रिकाम्या ठेवू नयेत. जाणून घेऊया या पाच गोष्टींबद्दल... (Vastu Tips)

धान्याचे भांडार

वास्तुशास्त्रानुसार घरातील अन्नाचे भांडार कधीही रिकामे ठेवू नये. जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी ते भरा, जेणेकरून ते तुमच्या वाढीमध्ये अडथळा बनू नये. पूर्ण धान्याचे भांडार जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते.

तसेच दररोज माता अन्नपूर्णेची पूजा करा, माता अन्नपूर्णा ही संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य यांची देवी आहे. दररोज त्यांची पूजा केल्याने घरातील भांडार कधीही रिकामे राहत नाही.

बाथरुममध्ये रिकामी बादली

वास्तू शास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही बादली वापरत नसाल तर ती नेहमी पाण्याने भरून ठेवा.

तसेच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आंघोळीसाठी निळी बादली वापरा.बादली वापरल्यावर त्यात पाणी भरा आणि रिकामी ठेवू नका.

देवघरात पाण्याचे भांडे रिकामे ठेवू नका

बहुतेक घरांमध्ये पूजेची जागा असते आणि तिथे पूजेशी संबंधित गोष्टी असतात जसे की पाण्याचे भांडे, घंटा इत्यादी. वास्तुशास्त्रानुसार देवघरात असलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. पूजा केल्यानंतर भांडे पाण्याने भरा आणि त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीचे पान टाका. देवालाही तहान लागते असे मानले जाते.

असे पाण्याने भरलेले भांडे पूजेच्या खोलीत ठेवल्यास देवाला तहान लागत नाही आणि तृप्त राहतो. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. त्याचबरोबर रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.

तिजोरी कधीही रिकामी करू नका

तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी नसावी हे नेहमी लक्षात ठेवावे. थोडे पैसे नेहमी ठेवावेत. रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे गरिबी येते. त्यामुळे तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजेत, हे ध्यानात ठेवले पाहिजे.

हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नका. यासोबत तिजोरीत गाई, गोमती चक्र, शंखही ठेवू शकता. यामुळे तुमची समृद्धी आणखी वाढते.

कोणाचाही अपमान करू नका

आपल्या समृद्धीमध्ये तुम्ही कोणाशी कसे बोलता हे खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे चुकूनही जिभेचा अती वापर करू नका, म्हणजेच जिभेने कोणाचाही अपमान करू नका. घरातील वडीलधाऱ्यांना मानसिक त्रास होईल असे काही बोलू नका.

असे केल्याने माता लक्ष्मीला राग येतो आणि ती आपला मार्ग बदलते. म्हणूनच घरातील मोठ्यांचा कधीही अनादर करू नका. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात की कृतीतून, शब्दातून आणि मनाने कोणाचाही अपमान करू नये. (Vastu Tips)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT