curd sakal
लाइफस्टाइल

Monsoon: पावसाळ्यात दही का खाऊ नये? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ

पावसाळ्यात दही खाऊ नये असे अनेकांना बोलताना ऐकले आहे का?

Aishwarya Musale

पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हे हवामान जरी उष्णतेपासून दिलासा देण्याचे काम करते. पण सोबत अनेक आजारही घेऊन येतात. बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच निरोगी जीवनशैली पाळली पाहिजे. खाण्यापिण्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. परंतु आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.

ते खाल्ल्याने आरोग्यास हानी होऊ शकते. पण तुम्हाला माहीत आहे का या ऋतूत दही का खाऊ नये. या ऋतूत दही खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होते. यावर आयुर्वेद तज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.

दिल्ली एमसीडीचे आयुर्वेदिक अधिकारी डॉ आर पी पाराशर यांच्या मते, यामुळे फोड आणि पिंपल्ससारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय त्वचेवर खाज येण्याची समस्या होऊ शकते. म्हणूनच या ऋतूत दही खाणे टाळावे. यासोबतच या ऋतूत दही खाल्ल्याने फंगल इन्फेक्शनची समस्याही वाढते. त्यामुळे पावसाळ्यात दही खाणे टाळावे.

पचन समस्या

या ऋतूत दही खाल्ल्याने मेटाबॉलिज्म बिघडते. तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात. त्यामुळे अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यामुळे, पोटात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच या ऋतूत दही खाणे टाळावे.

दही खाल्ल्याने तुमची पचनशक्ती कमजोर होते. पावसाळ्यात दही खाल्ल्याने खोकला आणि सर्दी होऊ शकते. ताप देखील होऊ शकतो. ज्या लोकांना फुफ्फुसाची समस्या आहे. दही खाल्ल्याने त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो. म्हणूनच ते खाणे टाळावे.

हाडांच्या समस्या

दिल्लीतील आयुर्वेदाचार्य डॉ.भारत भूषण यांच्या मते, या ऋतूत दही खाल्ल्याने हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दही खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT