Shahu Chhatrapati Maharaj esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : 'आजपर्यंत मी समाजकारणात होतो, आता थेट राजकारणात आलो आहे'; काय म्हणाले 'मविआ'चे उमेदवार शाहू महाराज?

'मी मुंबई, दिल्लीत न जाता कोल्हापुरात राहून मला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली, हीच खरी लोकशाही आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'समाजकारण करताना राजकारण होत आहे. संविधान वाचवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.’

कोल्हापूर : ‘लोकशाही (Democracy) एकाधिकारशाहीच्या वळणावर आहे. सत्तेचा उपयोग केला पाहिजे, पण दुरुपयोग होता कामा नये. आजपर्यंत मी समाजकारणात होतो, आता थेट राजकारणात आलो आहे. मी मुंबई, दिल्लीत न जाता कोल्हापुरात राहून मला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली, हीच खरी लोकशाही आहे’, असे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याचवेळी त्यांनी मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे रुंदीकरण, कोकणाला रेल्वे (Konkan Railway) जोडणे, विमान, पर्यावरण, गडसंवर्धन, पर्यटन विकास हे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार असल्याचे स्पष्ट केले. जनतेच्या आग्रहामुळेच राजकारणात आल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.

महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसची (Congress) उमेदवारी मिळाल्यानंतर आज शाहू महाराजांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘शाहू, फुले, आंबेडकरांचा समतेचा विचार आजही महत्त्‍वाचा आहे. तोच पुढे घेऊन जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली दिशा, रयतेसाठी केलेले काम महत्त्‍वाचे आहे. तेच करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. राज्यात व देशात मी एकटाच आहे की, तीनही पक्षांनी माझे नाव उमेदवारीसाठी मनापासून पुढे केले. या सर्वांचा पाठिंबा आहे, त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर आहे.

कोल्हापुरातील रेल्वे ट्रॅकचे रुंदीकरण, कोल्हापूर-कोकण रेल्वे जोडणे, विमानतळाचे विस्तारीकरण, आरोग्य, पर्यावरण, शेतकरी, प्रदूषणमुक्त पंचगंगा, गडकिल्ले, अंबाबाई मंदिरापासून ऐतिहासिक पर्यटन विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहे.’

सद्यःस्थितीबाबत बोलताना शाहू महाराज म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे. पण त्यामध्ये इतिहास बदलता येणार नाही. जे आहे तेच सर्वांसमोर आणणे आवश्‍यक असेल. शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. आहे ते महामार्ग, रस्ते व्यवस्थित होत नाहीत, त्याला प्राधान्य दिले पाहिजे. जेथे तातडीने गरज नाही तेथे शेतकऱ्यांच्या जमिनी जात असतील तर त्याचा पुनर्रविचार केला पाहिजे.

कोल्हापुरात उद्योग यायला पाहिजेत. समाजकारण करताना राजकारण होत आहे. संविधान वाचवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.’ दरम्यान, आज दिवसभर आमदार पी.एन.पाटील, विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली.

शाहू महाराज म्हणाले...

  • कोल्‍हापूरच्या विकासाला दिशा द्यायची आहे.

  • आंदोलन न करता शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे.

  • विद्यमान खासदारांनी काय काम केले, यावर मी बोलणार नाही.

  • अग्निवीर सैन्यभरतीचा निर्णय कशासाठी हेच कळत नाही.

  • शाहू मिलच्या जागेचे काय करायचे, एक निर्णय घ्यावा लागेल.

  • उमेदवारीसाठी मी सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गेंना एकदाही भेटलो नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election: एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी मध्यरात्री मॅरेथॉन बैठक, काय ठरलं? महापालिका निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक!

Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने राजधानीत साहित्य, संस्कृतीचा जागर; साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT