Sangli Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

..अखेर 'सांगली'बाबत उद्धव ठाकरेंनी ताठर भूमिका सोडली; काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार, लवकरच निघणार तोडगा?

सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) शिवसेना (Shiv Sena) नेतृत्वाने अखेर ताठर भूमिका सोडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या ठाकरे गटाचा सांगली लोकसभा मतदारसंघात कोणताही प्रभाव नाही तर मुंबईतील दक्षिण मध्य मतदारसंघात काँग्रेस शहराध्यक्ष वर्षा गायकवाड उत्तम लढत देत विजयी होऊ शकतात.

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) शिवसेना (Shiv Sena) नेतृत्वाने अखेर ताठर भूमिका सोडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जागेबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. दिल्लीतून महाराष्ट्रात आल्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसह आमदार विश्‍वजित कदम यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे दिल्लीतील चर्चेत ठरले आहे. आमदार विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी ‘सकाळ’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला.

दिल्लीत काल इंडिया आघाडीचा मोर्चा निघाला. त्यात सांगलीसह भिवंडी आणि मुंबईतील तीन वादग्रस्त जागांवर चर्चा अपेक्षित होती. सकाळी प्रदेश काँग्रेसचे नेते आणि शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. शिवसेनेकडून सांगलीवरील दावा सोडला जाणार नाही, असा सकाळी निरोप देण्यात आला होता. काँग्रेस नेत्यांनीही आम्ही सांगली लढतोय, मैत्रीपूर्ण लढत करू, असा निरोप शिवसेनेला दिला. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे.

आमदार विश्‍वजित कदम म्हणाले, ‘‘सांगली लोकसभा मतदारसंघ लढवण्याबाबत आम्ही ठाम आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे. हे वातावरण नक्कीच काँग्रेसला ताकद देणारे आणि नवी उभारी देणारे आहे. आम्ही शिवसेना नेतृत्वाला आज दिल्लीत त्याची कल्पना दिली आहे. त्यांनी या जागेबाबत चर्चेची तयारी दर्शवली, हे महत्त्वाचे आहे. चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल आणि महाविकास आघाडीच्या हिताचा निर्णय होईल, अशी मला खात्री आहे.’’

सांगली, दक्षिण मध्य मुंबईमधून काँग्रेसला लढू द्या!

मुंबई : ठाकरे गटाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्रातील जागा वाटपाबद्दलची चर्चा २०२९ सालीच होईल, असे सांगत लोकसभा मतदारसंघांच्या फेरविचारास ठाम नकार दिला असला तरी सांगली, दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही जागा काँग्रेसच्या आहेत. त्या परत घ्या, अशी विनवणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना केली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचा सांगली लोकसभा मतदारसंघात कोणताही प्रभाव नाही तर मुंबईतील दक्षिण मध्य मतदारसंघात काँग्रेस शहराध्यक्ष वर्षा गायकवाड उत्तम लढत देत विजयी होऊ शकतात. परिस्थिती अनुकूल असताना काँग्रेसने या दोन्ही जागांसाठी आग्रह धरायला हवा, असे आग्रही प्रतिपादन आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांना करण्यात आले. पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांच्याशीही या विषयावर बोलणे झाले. त्यांनी या संबंधात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती नाना पटोले यांनी ‘सकाळ’ला दिली. यासंदर्भात आता हायकमांड योग्य वाटेल तो निर्णय घेतील, असेही पटोले म्हणाले.

भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हवी असल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेस या जागेबाबत ठाम आहे. काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी दिल्लीत आयोजित झालेल्या रॅलीनंतर तेथे हजर असलेल्या उद्धव ठाकरेंशी गांधी मातापुत्र चर्चा करतील, असा विश्वास काँग्रेसच्या प्रदेशातील नेत्यांना होता. उद्धव ठाकरे यांनाही पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील कौल अपेक्षित असल्याने ते समजूतदारपणा दाखवतील, अशी आशाही नेत्यांनी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT