harshawardhan patil
harshawardhan patil 
Loksabha 2019

Loksabha 2019 : विकासाचे मुद्दे नसल्याने गांधी, पवार कुटुंबावर टीका : हर्षवर्धन पाटील

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : केंद्र व राज्यातील भाजप सरकराने जनतेला भलीमोठी आश्‍वासने दिली. गेल्या साडेचार वर्षांत एकाही आश्‍वासनाची पूर्तता करता आली नाही. प्रचारात सांगण्यासारखे काहीच नसल्याने आता गांधी, पवार कुटुंबियांवर टीका केली जात आहे. भाजप नेत्यांनी आत्मविश्‍वास गमवला असून, एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (ता. 11) केली. 

पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, राज्यातील प्रत्येक घटक सरकारवर नाराज आहे. शेतकरी, व्यापारी, तरूणांमध्ये असंतोष आहे. तो येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीतून बाहेर पडेल. फरवेगिरी करणारे सरकार नको, अशी जनतेची भावना असून, गेल्या दहा दिवसात महाआघाडीच्या बाजून वातावरण तयार झाले आहे, असा दावा त्यांनी केला. पत्रकार परिषदेला माजीमंत्री अनिल पटेल, प्रकाश मुगदिया, प्रा. रविंद्र बनसोड, माजी आमदार एम. एम. शेख, डॉ. पवन डोंगरे यांची उपस्थिती होती. 

प्रकाश आंबेडकर भाजपटी "बी टीम' 
मतांचे विभाजन होऊ नये म्हणून महाआघाडीसाठी कॉंग्रेसने पुढाकार घेतला. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सात बैठका झाल्या. त्यांना 10 जागा सोडण्याची तयारी झाली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी 22 जागांची मागणी केली. महाआघाडीसोबत त्यांना यायचे नव्हते. भाजपची "बी टीम' म्हणून ते काम करत आहेत, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे, असे पाटील म्हणाले. 

वीस वर्षांत खैरेंनी काय केले? 
शिवसेनेचे चंद्रकांत खैरे वीस वर्षांपासून खासदार आहेत. त्यांनी औरंगाबाद शहरासाठी काय केले? असा प्रश्‍न पाटील यांनी केला. ते संसदेत कधी बोलल्याचे दिसले नाही. कचरा, पाणी समस्या व शहराच्या अधोगतीला खैरेच जबाबदार आहेत, अशी टीका पाटील यांनी केली. 

सत्तारांसाठी दारे बंद 
बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी मीच पक्ष सोडला आहे, असे स्वतःच सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा करण्याची गरज काय? असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. पक्षापेक्षा कोणी मोठे नाही, असा टोला त्यांनी यावेळी मारला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT