Narendra Modi And Abhijit Pawar 
Loksabha 2019

ModiWithSakal : बालाकोटमध्ये काही झालेच नाही असे दाखवणे पाकिस्तानची चलाखी : मोदी

सकाळवृत्तसेवा

प्रश्‍न : पाकिस्तानात बालाकोटमध्ये भारताने हवाई हल्ला केला. तिथे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांना नेऊन काहीच घडले नाही असे दाखवले, याबद्दल तुम्हाला काय वाटते?

उत्तर : सर्जिकल स्ट्राइक झाला तेव्हा पाकमध्ये २५० किमीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी आपल्या तुकड्या गेल्या. कोणाला पाच तास लागले, कोणाला दोन तास. मात्र हल्ला एकाच वेळी होईल असा समन्वय ठेवला होता. त्यानंतर २४ तासांत पाकिस्ताननं माध्यमांना नेऊन दाखवलं की कुठे काही घडलंच नाही. हे करता आले, कारण २५० किमीमध्ये अशा अनेक मोकळ्या जागा होत्या जिथे काहीच घडले नाही, ते त्यांच्यासाठी सोयीचे होते. बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर मात्र ४३ दिवस पाकिस्ताननं तिथं कोणाला जाऊ दिले नाही. पत्रकारांनाही प्रवेश दिला नाही. मात्र तिथल्या नागरिकांच्या मुलाखती झाल्या त्यातून हल्ला झाला हे स्पष्ट होतं आणि हल्ला झाला हे तर पाकिस्ताननंच जाहीर केलं. आम्ही सकाळी सांगणार होतो, पाकिस्ताननं पहाटेच जाहीर केलं, की कोणीतरी आलं आणि आम्हाला मारून गेलं. आता ४३ दिवसांत त्यांनी एकतर तिथं संपूर्ण साफसफाई केली असेल, नवं बांधकाम केलं असेल किंवा कोणत्या तरी नव्याच जागेवर माध्यमांना नेलं असेल, कारण तिथल्या डोंगरांमध्ये तेवढी एकच आस्थापना होती. सर्जिकल स्ट्राइकवेळी २५० किमीमध्ये काही झालं नाही असं दाखवणं ही त्यांची चलाखी होती आता ते जे करत आहेत ते भारतातील निवडणुका ध्यानात घेऊन सुरू आहे. निवडणुकांमध्ये अडथळे आणण्याचा खेळ पाकिस्तान करू इच्छितो. त्यासाठी हे सुरू आहे.

प्रश्‍न : बालाकोटमध्ये हल्ला झाला तिथे दहशतवादी प्रशिक्षणासाठी ६०० ते ७०० जण असायचे असे सांगितले जाते. म्हणून ३०० दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आपण केला हे बरोबर आहे का?
उत्तर : आपण पाहिलं असेल एका अमेरिकन पत्रकारानं एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यात पाकिस्तानच्या लष्कराचे अधिकारी नागरिकांचे सांत्वन करताना दिसतात. जो गेला त्याला स्वर्ग मिळेल, हा तर जिहाद आहे असे सांगताना दिसतात. मुलांना कवटाळून रडतात. यातून स्पष्ट होतं किती जण मारले गेले असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : पुण्यात भाजपचं सहावे पॅनल विजयीच

BMC निवडणुकीत विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट ते मनसे; कुणाचे किती उमेदवार जिंकले?

Latur Municipal Corporation Election Result 2026 : लातूरमध्ये विलासरावांच्या पुण्याईचा विजय, भाजपच्या सेल्फ गोलचा काँग्रेसने कसा उठवला फायदा ?

Baramati Municipal: बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता योगेश नाळे यांची निवड; शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणार!

Ichalkaranji Result 2026 Won Candidate List : इचलकरंजीत भाजपचा बोलबाला की धक्का? चुरशीच्या लढतीनंतर महापालिकेत सत्ता कुणाची? वाचा विजयी उमेदवारांची यादी

SCROLL FOR NEXT