Loksabha 2019

Loksabha 2019 : बालेकिल्ल्यातच राहुल गांधींची कोंडी; नागरिकत्वासह शैक्षणिक पात्रतेलाच आक्षेप

पीटीआय

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शिक्षणावरून भाजपने आता कॉंग्रेसला कोंडीत पकडले आहे. अमेठीतील राहुल यांची उमेदवारीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्यानंतर भाजपच्या टीकेला धार चढली आहे. राहुल यांनी हा वाद निस्तारावा आणि मग निवडणुकीला सामोरे जावे, असे भाजपने म्हटले आहे. आता यावर निवडणूक अधिकारी सोमवारी (ता.22) रोजी निर्णय घेणार आहेत. अमेठीच्या बालेकिल्ल्यात राहुल कोंडीत सापडल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. 

निवडणूक अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे. भाजपचे प्रवक्‍ते जी. व्ही. एल. नरसिंहराव यांनी राहुल यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारातील मजकुराचा हवाला देताना म्हटले आहे, ""गांधी यांच्या वकिलानेच उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंचा वेळ मागितला आहे.

खरंतर कॉंग्रेसने यावर तातडीने उत्तर देणे अपेक्षित होते. राहुल गांधींवरील आरोप गंभीर असून, ते भारतीय नागरिक आहेत की नाही, हे आता ठरवावे लागेल. ते कधीकाळी ब्रिटिश नागरिक बनले होते का? त्यांनीच आता या आरोपांवर बोलायला हवे.'' भाजपच्या या आरोपांवर कॉंग्रेसने मात्र अद्याप उत्तर दिलेले नाही. अमेठीतील अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांनी राहुल यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला आहे. 

आयोगाची माहिती 

या वादावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा निवडणूक अधिकाऱ्याला असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले, पण हा अधिकारी शपथपत्रामध्ये नेमके काय लिहिण्यात आले आहे, त्याची सत्यता पडताळून पाहू शकत नाही. एखादी व्यक्ती जर तक्रार घेऊन आली, तर त्याला पीडिताचा पक्ष जाणून घ्यावा लागतो. पण, संबंधित उमेदवाराने शपथपत्रामध्ये लिहिलेल्या माहितीलाच आक्षेप असेल, तर त्या व्यक्तीने न्यायालयामध्ये जायला हवे. यामध्ये तशी आयोगाची भूमिका नगण्यच असते. 

ब्रिटिश नागरिकत्व 

राहुल यांनी 2004 मध्ये ज्या कंपनीत गुंतवणूक केली तिला आपण ब्रिटिश नागरिक असल्याचे सांगितले. भारतीय कायद्यानुसार अन्य देशाचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्याचे येथील नागरिकत्व संपुष्टात येते. याबाबत कॉंग्रेसच्या अध्यक्षांनीच उत्तर द्यायला हवे. संबंधित ब्रिटिश कंपनीने चुकीचे निवेदन दिले असेल, तर राहुल यांनी तिच्यावर कारवाई करायला हवी. राहुल यांनी 2004 साली सादर केलेले शपथपत्र आणि 2014 मधील शपथपत्र यातील माहिती पडताळून पाहिल्यास त्यांनी माहिती आणि तथ्ये दडविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते, असे भाजपने म्हटले आहे. 

शिक्षणावरून वाद 

राहुल यांनी सुरवातीस केम्ब्रिज विद्यापीठातून डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्‍समधून एम.फील केल्याचा दावा केला होता, पण नंतर मात्र त्यांनी डेव्हलपमेंट स्टडीजमधून शिक्षण घेतल्याचे म्हटले आहे. अधिक माहिती अंती राहुल व्हिन्सी आणि राहुल गांधी यांना एका विशिष्ट वर्षात पदवी मिळाल्याचे दिसून येते. राहुल गांधी यांचे विविध देशांत वेगवेगळी नावे होती का, हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल, असा टोला राव यांनी लगावला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT