Ujjani Dam sakal
महाराष्ट्र बातम्या

उजनी सध्या १०० टक्के! यंदा पावसाळ्यात उजनीतून सोडले २१३ टीएमसी पाणी; शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मिळणार तीनवेळा पाणी; २० जानेवारीनंतर पहिले आवर्तन

उजनी धरण सध्या ११० टक्के भरले असून, धरणात ११७ टीएमसी पाणी आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा शेतीसाठीचे पहिले आवर्तन २० जानेवारीनंतर सुटणार आहे. त्यानंतर १ मार्च ते १५ जून या काळात दोनदा शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण सध्या ११० टक्के भरले असून, धरणात ११७ टीएमसी पाणी आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा शेतीसाठीचे पहिले आवर्तन २० जानेवारीनंतर सुटणार आहे. त्यानंतर १ मार्च ते १५ जून या काळात दोनदा शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. पण, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणातील पाण्याचे अंतिम नियोजन ठरणार आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात सध्या दौंडवरून पाच हजार क्युसेकच्या विसर्गाने पाणी जमा होत आहे. त्यामुळे धरणातून आता विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक आणि भीमा नदीतून १४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यंदाच्या पावसामुळे २० जूनपासून उजनीतून कालवा व भीमा नदीतून पाणी सोडण्यास सुरवात झाली.

२००३ नंतर पहिल्यांदाच यंदा उजनीतील २१३ टीएमसी पाणी भीमा नदीतून सोडून देण्यात आले आहे. जिल्हाभर अतिवृष्टी झाली, पूर आला. त्यामुळे या वर्षी शेतीसाठी रब्बी हंगामात जानेवारीपर्यंत तरी पाणी सोडावे लागणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे. यंदा १ फेब्रुवारी ते १५ जून या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण तीन आवर्तने सोडली जातील, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

एका आवर्तनासाठी किती लागते पाणी?

शेतीसाठी रब्बी हंगामात शक्यतो जानेवारीत पहिले आवर्तन सोडले जाते. त्यावेळी कडक उन्हाळा सुरू झालेला नसतो म्हणून सहा टीएमसी पाणी लागते. पण, मार्चनंतर एप्रिल-मे महिन्यात शेतीसाठी कालव्यातून आवर्तन सोडण्यासाठी दोन टीएमसी अतिरिक्त म्हणजेच आठ टीएमसी पाणी सोडावे लागते. तर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून दरवर्षी तीन ते चार वेळा पाणी सोडावे लागत होते. त्यासाठी प्रत्येक आवर्तनावेळी पाच टीएमसी पाणी सोडावे लागते. पण, आता समांतर जलवाहिनीतून पाणी उपसा सुरू झाल्याने सोलापूरसाठी नदीतून पाणी सोडणे बंद होणार आहे.

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ११७.२३ टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा

  • ५३.५७ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • ११० टक्के

  • सध्या सोडलेले पाणी

  • ३००० क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत फेरीवाल्याचा एकावर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT