Rajesh-Tope 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात आतापर्यंत ८ लाख कर्करुग्णांवर उपचार - राजेश टोपे

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे आठ लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. १४ जिल्ह्यामध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु करण्यात आले असून आतापर्यंत दोन हजार ८०० रुग्णांना त्याद्वारे उपचार मिळाले आहेत. कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करतानाच उपचारासाठी महाराष्ट्र कॅंन्सर वॉरिअर’ मार्फत २३ जिल्ह्यामध्ये सेवा दिली जात आहे. आतापर्यंत ४० हजार रुग्णांची तपासणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सध्या अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये केमोथेरेपी केंद्र सुरु झाले आहे. कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील फिशिजियन व परिचारिकांना केमोथेरेपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ठाणे, रायगड, नगर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम येथे प्रशिक्षण सुरु आहे.

सर्व सामान्यांना आवाक्‍याबाहेरील वैद्यकीय उपचारासाठी सुरु असलेल्या महात्मा फुले जन आरोग्याच्या माध्यमातून आतापर्यंत कर्करोगाशी संबंधीत विविध उपचार सुमारे ८ लाख रुग्णांवर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे सामान्यांना दिलासा मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Customs Duty: भारतातून आणलेल्या सामानावरील शुल्क सवलत वाढली! नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; सीमेलगतच्या नागरिकांना मोठा फायदा

Krunal Pandya: हार्दिक आणि कृणालमध्ये खरंच दुरावा आला आहे? अखेर मोठ्या भावानेच सांगितले संपूर्ण सत्य, म्हणाला आमच्यात वाद...

Ghodegaon Crime : जुन्या वादातून आयटीआय वसतिगृहात तरुणाला संपविले; पोलिसांकडून काही तासांतच आरोपीला बेड्या

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गावी गेलेल्या कुटूंबाचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू

Mumbai News: दिल्लीतील अग्निकांडानंतर मुंबई फायर ब्रिगेड सतर्क, हॉटेलांवर 'अग्निशमन'ची करडी नजर

SCROLL FOR NEXT