aditi tatkare amswer imtiyaz jaleel question over family members joining politics  
महाराष्ट्र बातम्या

जलील यांनी विचारलेल्या घराणेशाहीच्या प्रश्नावर आदिती तटकरेंनी दिलं खणखणीत उत्तर

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात एकाच घरातील अनेक जण नेते म्हणून पुढे येतात, राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत की वडीलांपाठोपाठ मुले देखील राजकीयय क्षेत्रात दाखल झाली आणि पुढे मंत्रीपदावर काम करत आहेत. याबाबत खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी सरकारनामा ओपन माइक कार्यक्रमात आदिती तटकरेंना राजकरणातील घराणेशाहीवर 'बाकी कार्यकर्ते काय गोट्या खेळायला आहेत का?' असा तिखट प्रश्न विचारला.

खासदार जलील यांनी आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना प्रश्न विचारला की, 'आपल्या घरातील किती लोक हे राजकार मोठ्या पदावर आहेत? तुमचे वडील लोकसभेत तुम्ही विधानसभेत मग बाकी कार्यकर्ते काय गोट्या खेळायला आहेत का?' या थेट विचारण्यात आलेल्या प्रश्नाला आदिती तटकरे यांनी तेवढ्याच समर्थपणे खणखणीत उत्तर देखील दिलं.

अदिती तटकरे म्हणाल्या की, आम्ही तीन जण पदावर आहोत, एक वडील लोकसभा खासदार आहेत, मी विधानसभा आणि भाऊ विधानपरिषदेत आहे, आणि वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही निवडणूक न लढता निवडूण आलेला नाहीये, लोकांमधूनच निवडूण आले आहेत, तसेच कार्यकर्त्यांना मंजूर असेल म्हणूनच त्यांनी निवडूण दिलं असेल, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

पुढे खासदर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, आपण परिवारात सगळ्यात लहान असून, सर्वात कमी वयात मंत्री झालात, वडील लोकसभेत आहेत, तुम्हाला मंत्री म्हणून लोकसभेत जायला आवडेल का? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना तटकरे म्हणाल्या की, सध्या ही पहिलीच टर्म आहे, वडील २५ वर्ष आमदार राहीले त्यानंतर खासदार झाले. यांनंतर आमदार धीरज देशमुख यांनी एक पेचात टाकणारा प्रश्न विचारला. तसेच त्यांनी प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे, एकाची निवड करावी लागेल अशी अट घालत, 'अजितदादा की सुप्रियाताई?' असा प्रश्न त्यांना केला. यावर आदिती तटकरे यांनी, राज्यात अजितदादा आणि केंद्रात सुप्रियाताई असं सोप उत्तर देत हा पेच सोडवला.

यानंतर पुढे आमदार परिणय फुके यांनी प्रश्न केला की, तुमचं काम बघून जर पक्षश्रेष्ठींना वाटलं की, तुमतं प्रमोशन करावं तर तुम्हाला गृह खातं, अल्पसंख्याक खातं यापैकी कोणत्या खात्याच्या कॅबिनेट मंत्री व्हायला आवडेल?. या प्रश्नाचे उत्तर देताना आदिती तटकरे यांनी मी सध्यातरी राज्यमंत्री म्हणून खूश आहे, पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री मिळणं पण मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच सध्याची महाविकास आघाडी सरकारची स्थिती पाहता २५ वर्ष हे सरकार टिकायला हरकत नाही, त्यामुळे पुढच्या टर्ममध्ये कॅबीनेट मंत्रीपद मिळालं तर चांगलं होईल, असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT