महाराष्ट्र बातम्या

'जनतेवर अन्याय व्हावा, असं सरकारला वाटत नसतं'; बारसु प्रकल्पावर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar on Barsu Refinery : कोकणातल्या बारसु येथे होणाऱ्या रिफायनरीला ठाकरे गटाचा कडाडून विरोध आहे. परंतु खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारसु प्रकरणात वेगळी भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

आज पत्रकारांशी बोलतांना अजित पवार यांनी मोठे प्रकल्प यावेत, अशी भूमिका व्यक्त केली असून त्यामुळेच एक लाख लोकांना रोजगार मिळू शकतो, असं म्हटलं आहे.

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, कुठल्याच सरकारला जनतेवर अन्याय व्हावा, असं वाटत नसतं. सुरुवातीला हा प्रकल्प नाणारला होणार होता. परंतु तिथे विरोध झाल्याने बारसुला होत आहे.

मुळात ठाकरे गटाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. येथे होणारा विरोध खरंच स्थानिकांचा आहे का? बघावं लागेल. अनेक एनजीओ आंदोलनात उतरल्याची माहिती असल्याचं अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

  • कुठल्याच सरकारला जनतेवर अन्याय व्हावा, असं वाटत नाही

  • हा प्रकल्प नाणारला होणार होता. आता बारसुला होतोय

  • मी पुन्हा बारकाईने माहिती घेत आहे

  • स्थानिक लोकप्रतिनिधींचा प्रकल्पाला पाठिंबा आहे

  • जे ठाकरे गटाचे आहेत, त्यांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे

  • सरकारने संवेदनशीलपणे समस्या सोडवायच्या असतात

  • खरंच स्थानिकांचा किती विरोध आहे, एनजीओ किती उतरल्या आहेत

    आणि बाहेरचे लोक किती उतरले आहेत, हे बघावं लागेल

  • बेरोजगारी दूर करायची असेल तर मोठे प्रकल्प आणले गेले पाहिजेत

  • या प्रकल्पातून एक लाख तरुण-तरुणींना रोजगार मिळू शकतो

  • हे करत असतांना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे

  • राजकीय एँगलने या प्रकल्पाकडे बघू नये

  • आधीच वेदांताचा प्रकल्प आपल्या हातून गेला आहे

    त्यामुळे या प्रकल्पाची आणखी माहिती घेणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT