Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: मंत्रीमंडळ बैठकीतून बाहेर पडण्यामागं नाराजीचं कारण होतं का? अजित पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं

राज्य मंत्रीमंडळाची शेवटची बैठक काल पार पडली, यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पण या बैठकीतून अजित पवार अर्ध्यातूनच निघून गेले होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाची शेवटची बैठक काल पार पडली, यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पण या बैठकीतून अजित पवार अर्ध्यातूनच निघून गेले होते. अजित पवार नाराज असल्यानं या बैठकीतून अर्ध्यातूनच निघून गेले असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेवर आता खुद्द अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

अजित पवार म्हणाले, काल लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात माझ्या नियोजित कार्यक्रम होता. तर कालच सकाळी १० वाजता कॅबिनेटची बैठक होती. पण काही कारणांमुळं ही बैठक उशीरा सुरु झाली. पण माझ्या हेलिकॉप्टरला दुपारी १ वाजता टेकऑफ करायचं होतं. त्यामुळं कॅबिनेट उशीरा सुरु झाल्यानं साडे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत मी तिथं थांबलो.

१ वाजता मला जाणं गरजेचं होतं. कारण २ वाजेपर्यंत मला नांदेडला पोहोचून तिथून पुन्हा हेलिकॉप्टरनं अहमदपूरला जायचं होतं. तिथं अत्यंत साधेपणानं एक शेतकरी मेळावा मी केला. यावेळी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर मी पुन्हा मुंबईत आलो, अशी खरी वस्तुस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

B Pharmacy: बी फार्मसी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर; ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना जागा मिळाली

Latest Marathi News Live Update : १ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी

ऐकावं ते नवलंच! तब्बल १२ दिवस चाललेला कसोटी सामना, शेवटी एका संघाला परतीची बोट पकडायची होती म्हणून मॅच थांबली अन्यथा...

'ब्रेकअप के बाद' पुन्हा जवळीक, बनकरच्या आजारपणामुळे दुरावा झाला कमी; महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT