Ashish-Deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

‘राज्यातील सर्व कुलगुरू संघाच्या विचारांचे’ - आशिष देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यातील सर्व विद्यापीठात संघ विचारांशी बांधिलकी असणाऱ्या कुलगुरूंची नियुक्ती भाजप सरकारने केलेली असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. राज्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनांची पुनरावृत्ती टाळायची असल्यास या नियुक्‍त्या रद्द करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. 

जेएनयूतील हिंसाचाराला जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी पाठिंबा दिला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यापीठांत नियुक्त असणाऱ्या संघ विचारांचे, समर्थक कुलगुरूंना पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, सर्व नियुक्‍त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या असल्याचा दावा माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT