Arunachal Pradesh CM Pema Khandu esakal
महाराष्ट्र बातम्या

'हा 1962 चा काळ नाही, तर 2022 मधील PM मोदींचं युग आहे'; भारत-चीन तणावावर मुख्यमंत्र्यांचं परखड मत

मुख्यमंत्र्यांनी भारत-तिबेट सीमेवरील तणावाला माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरलंय.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्र्यांनी भारत-तिबेट सीमेवरील तणावाला माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरलंय.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू (Arunachal Pradesh CM Pema Khandu) यांनी भारत-तिबेट सीमेवरील (India-Tibet Border) तणावाला माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांना जबाबदार धरलंय.

मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात मुख्यमंत्री खांडू म्हणाले, 'शिमला करारानंतर तवांगसह संपूर्ण अरुणाचल प्रदेश भारताचा प्रदेश बनला. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची निर्णायक भूमिका होती. माजी पंतप्रधानांनी (जवाहरलाल नेहरू) वेळीच निर्णय न घेतल्यामुळं परिस्थिती सतत खराब होत गेली.'

तवांगचा भारतात समावेश करण्याची कल्पना सरदार पटेल यांची होती आणि राज्यपाल दौलतराम यांनाही तवांगमध्ये तिरंगा फडकवण्यास सांगितलं होतं. राज्यपालांनी मेजर बॉब खाथिंग यांना तिरंगा फडकवण्यास सांगितलं. तवांगला पोहोचून त्यांनी केंद्राकडं परवानगी मागितली. परंतु, कोणताही आदेश नसल्यामुळं खाथिंग यांनी स्वतः तिथं ध्वज फडकवला, असं खांडू यांनी सांगितलं.

'हे 2022 पीएम मोदींचं युग आहे'

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री खांडू पुढं म्हणाले, तवांगमध्ये 9 डिसेंबरला एक दुर्दैवी घटना घडली. चिनी सैन्यानं भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यात काही जवान जखमी झाले. परंतु, हा 1962 चा काळ नाही तर 2022 मधील पीएम मोदींचा (PM Modi) काळ आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT