Shankarrao Kolhe vs Dilip WalsePatil esakal
महाराष्ट्र बातम्या

निधनाआधी शंकरराव कोल्हेंनी गृहमंत्र्यांना पाठवलं होतं 'पत्र'

सकाळ डिजिटल टीम

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं आहे.

Shankarrao Kolhe Passes away : सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे (Shankarrao Kolhe) यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भूमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी दु:ख व्यक्त केलंय.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी आपल्या ट्विटटमध्ये लिहिलंय, शंकरराव कोल्हे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते होते. शंकररावांनी आयुष्यभर शेती, शेतकरी, सहकारासाठी काम केलंय. माझ्या आणि त्यांच्या वयात अंतर होतं. मात्र, तरी देखील शंकररावांशी घनिष्ठ परिचय होता. शंकररावांनी चार दिवस आधी ख्याली-खुशाली विचारणारं पत्र पाठवलं होतं, त्या पत्राला कालच मी उत्तर पाठवलं. त्यांच्या निधनाची ही दुःखद बातमी आहे. शंकररावांच्या कुटुंबीयांच्या दु:खत आम्ही सहभागी आहोत, असं त्यांनी नमूद केलंय.

Shankarrao Kolhe vs Dilip WalsePatil

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्‍या शंकरराव कोल्हे यांच्या निधनानं सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपल्याची भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलीय. राज्यातील कृषी उत्पादनातल्या प्रयोगशीलतेला व्यापक चालना दिली, ती शंकरराव अप्पांनी. शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात विद्यार्थीदशेतच त्यांना स्थान मिळालं होतं. अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी कोपरगाव व संजीवनी कारखान्यांच्या माध्यमातून परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला. पाण्याचा प्रश्न सोडवला. खंडकरी शेतकर्‍यांची चळवळ चालवली. तसेच सहकारी संस्थांसोबत शिक्षणसंस्थांचं मोठं जाळं उभारलं. साखर या विषयासाठी जगभ्रमंती करून शंकररावांनी प्रचंड व्यासंग केला. ग्रामीण विकासासाठी आंतरिक तळमळ आणि प्रबळ इच्छाशक्ती हे त्यांचं गुणविशेष सामाजिक क्षेत्रात नव्यानं येणाऱ्या कार्यकर्त्यांनी अंगीकरावं, असंही पवारांनी सांगितलं.

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या निधनानं राज्याच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचं मत मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केलंय. शंकररावांनी समाजकारणासह राज्याच्या सहकार, कृषी, शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT