Bhagat Singh Koshyari sakal
महाराष्ट्र बातम्या

Bhagat Singh Koshyari : कोश्यारी राजभवनात परतले! सत्तेच्या गदारोळात नव्या राज्यपालांना मार्गदर्शन?

संतोष कानडे

मुंबईः महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात चर्चिले गेलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राजभवनामध्ये त्यांचा तब्बल सहा दिवस मुक्काम आहे. त्यामुळे या सहा दिवसांमध्ये ते नेमकं काय धडे गिरवणार आहेत, यासंबंधीच्या चर्चा रंगल्या आहे.

राज्यातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर संभ्रम निर्माण झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा प्रतोद बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने नमूद केलं खरं परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने शिंदेंची सत्ता कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं.

आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांची बैठक घेत आहेत. त्यातच भगतसिंग कोश्यारी जे आजपासून २१ तारखेपर्यंत मुबंई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांचा राजभवनात मुक्काम असणार आहे. १७ मे २० मे दरम्यान त्यांचे नियोजित कार्यक्रम असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामध्ये राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सत्तास्थापनेचं दिलेलं निमंत्रण घटनाबाह्य असल्याचं नमूद केलं होतं. विरोधकांच्या हालचाली, सत्ताधाऱ्यांची अस्थिरता या अनुषंगाने कोश्यारींचा दौरा चर्चिला जात आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर कोश्यारी राजभवनात सहा दिवस मुक्काम करणार असल्याने नेमकी खेळी काय? राज्यपाल काही धडे देणार आहेत का? यासंबंधी चर्चांना उत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

SCROLL FOR NEXT