Rahul gandhi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo: हिंगोलीत राहुल गांधी भावूक; दिवंगत राजीव सातव यांची आठवण काढत म्हणाले...

हिंगोलीत राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतली

सकाळ डिजिटल टीम

कन्याकुमारीपासून ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली असून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पाच दिवसांनी आता शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यात यात्रेने प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे नेते, पदाधिकारी, साहित्यिक, वकीलांपासून ते सर्वसामान्य नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. जिल्ह्यात देगलूरपासून यात्रेचे मोठ्या उत्साहात आणि हजारोंच्या संख्येने स्वागत करण्यात आले.

कॉँग्रेससह इतर पक्षांचे तसेच संघटनांचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. हिंगोलीत राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतली त्या सभेला संबोधीत करताना गांधी म्हणाले "राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले राजीव सातव हे आपल्यात नाही. याचे दु:ख वाटते, यासाठी कि तो मित्र होता, त्यापेक्षा तो काम अधिक चांगला करत होता. माझी त्याची जेव्हा भेट व्हायची तेव्हा तुमचाच आवाज त्याच्या तोंडून निघायचा. तो आपलं कधी प्रश्न घेवीन माझ्याकडे आले नाही"

"आज आनंद आहे, त्यांची पत्नी पदयात्रेत दिवसभर सोबत चालल्या. ही यात्रा आम्ही कन्याकुमारी पासून सुरू केला आणि श्रीनगर पर्यंत जाणार आहे. आणि आमच्याकडे जो तिरंगा आहे. तो आम्ही श्रीनगर मध्ये फडकवणार आहे. आम्ही जेव्हा लोकसभेत, राज्यसभेत देशातील प्रश्नांवर बोलतो तेव्हा आमचे माईक बंद केले जातात" अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT