mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीची घोषणा; शेतकऱ्यांकडे बँकांची ३५ हजार कोटी थकबाकी; २४.७३ लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद

थकबाकी न भरल्याने २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद झाले आहेत. यंदा अतिवृष्टीत राज्यातील ६९ लाख हेक्टर जमिनीवरील खरीप पिके वाया गेली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने थकबाकीची माहिती मागविली असून हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३५ हजार ४७७ कोटी थकबाकी असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या (एसएलबीसी) अहवालातून समोर आले आहे. थकबाकी न भरल्याने २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद झाले आहेत. यंदा अतिवृष्टीत राज्यातील ६९ लाख हेक्टर जमिनीवरील खरीप पिके वाया गेली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने थकबाकीची माहिती मागविली असून हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे.

सोलापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, जालना, नांदेड, परभणी, पुणे व यवतमाळ या दहा जिल्ह्यांमधील सरासरी एक लाख ते दोन लाख शेतकरी बॅंकांचे थकबाकीदार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पावणेतीन लाख शेतकऱ्यांकडे बॅंकांचे तीन हजार ९७६ कोटी रुपये थकल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या माहितीवरून समोर आले आहे. दुसरीकडे दहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या डोक्यावर खासगी सावकारांच्या दीड ते दोन हजार कोटी रुपयांचा बोजा आहे.

नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान, दुसरीकडे बॅंकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा, यातून अडचणीत सापडलेला शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करू लागला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडे राज्यात दररोज सहा शेतकरी आत्महत्या करीत असल्याची नोंद आहे. थकबाकीच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी विरोधकांकडून होत असून महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमपत्रिकेवरही हा विषय होताच. आता कर्जमाफीसंदर्भातील समिती त्यावर अभ्यास करून ऑक्टोबरअखेर सरकारला अहवाल सादर करणार आहे.

२२ जिल्ह्यात कमी थकबाकी

राज्यातील ३६ पैकी सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, जालना, मुंबई, नागपूर, बीड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, वर्धा, यवतमाळ व धुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडे तब्बल ३० हजार कोटींची थकबाकी आहे. उर्वरित २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडे शेतकर्जाची अवघी साडेतीन हजार कोटींची थकबाकी असल्याचेही ‘एसएलबीसी’च्या अहवालात नमूद आहे.

राज्यातील स्थिती

  • एकूण शेतकरी

  • १,३३,४४,२०९

  • एकूण कर्जवाटप

  • २,७८,२६५ कोटी रुपये

  • थकबाकीदार शेतकरी

  • २४,७३,५६६

  • शेतकऱ्यांकडील थकबाकी

  • ३५,४७७ कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापुरात सकाळपासून संततधार, पंढरपूरला अतिवृष्टीचा इशारा; सीना नदीला पुन्हा पुराचा धोका, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

Pune Health News : पुण्यात विषाणुजन्य आजारांत वाढ, तज्ज्ञांचे निरीक्षण; रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, थकव्याची लक्षणे

Ajit Pawar : शांतीत क्रांती! अजितदादांचा मनपा निवडणुकीआधी भाजपला 'दे धक्का', जुने सहकारी परतणार; आज पक्षप्रवेश

Latest Marathi News Live Update : हजार मतदार नोंदवा, नगरसेवक पदाचं तिकिट मिळवा; बावनकुळेंचं इच्छुकांना टार्गेट

राज्यात पुढचे ३ दिवस धोक्याचे! मराठवाडा, विदर्भ ते कोकणात जोरदार पाऊस, आज सर्वदूर पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT