Untitled-3.jpg
Untitled-3.jpg 
महाराष्ट्र

'या' कारणांमुळेच हरलो, भाजपच्या पराभूत उमेदवारांचा सूर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपने 59 पराभूत उमेदवारांसोबत बैठक घेऊन पराभवावर विचारमंथन केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा आणि शिवसेना यांच्यामुळे पराभव झाला, असा सूर भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत निघाला.

दरम्यान, भाजपने शिवसेनेला एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर 25 वर्ष जुन्या युतीत फाटाफूट झाल्याचं स्पष्ट झालं. शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी भाजपने अमान्य केली आणि दोघांमध्ये दुरावा आला. राज्यातल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने मंथन बैठकीचं आयोजन केलं होतं.

यावेळी पराभूत उमेदवारांनी शिवसेनेने केलेल्या असहकार्यामुळे आम्हाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असा सूर लावला. याशिवाय शरद पवारांनी भर पावसात घेतलेली सभाही पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचं या उमेदवारांचं म्हणणं आहे. या बैठकीला पंकजा मुंडे, राम शिंदे, राजकुमार बडोले, एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी खडसे, हर्षवर्धन पाटील आणि वैभव पिचड यासारखे दिग्गज उमेदवार उपस्थित होते.

भाजपने विधानसभा निवडणुकीत 164 जागा लढवल्या होत्या, मात्र 105 जागांवरच त्यांना विजय मिळवता आला. काही उमेदवारांना स्वीकारावा लागलेला पराभव हा निसटता होता. यावेळी स्थानिक कारणं देखील कारणीभूत असल्याचं निष्कर्ष काढण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT